शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचा विकास शक्य - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:37 IST

जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरीत्या समजते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करून हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

मुंबई : जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरीत्या समजते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करून हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यामुळे त्यांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले. केंद्र शासनाच्या राजभाषा संचालनालयामार्फत राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स कॉलनी येथे आयोजित पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हिंदी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, देशातील एकात्मता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हिंदीचे योगदान महत्त्वाचे आहे. विनोबा भावे यांनी भूदान आंदोलनाच्या यशस्वीतेचे श्रेय हिंदीला दिले. महात्मा गांधींनी देशाच्या एकात्मतेसाठी राजभाषेचा आग्रह धरला. त्यामुळे हिंदी बोलण्याचा संकोच बाळगू नये.प्रभास कुमार झा म्हणाले, राजभाषा विभागाने देशातील १४ भाषांतून सोप्या पद्धतीने हिंदी शिकण्यासाठी ‘लीला’ मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. या कार्यक्रमात शासकीय मध्य विभाग आणि पश्चिम विभागातील केंद्र शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीयीकृत बँका आदींना कामकाजात हिंदीचा अवलंब केल्याबद्दल २०१७साठीचा ‘राजभाषा पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते दिला.सांस्कृतिक कार्य विभागाने मागे राहू नयेमातृभाषा चांगल्या प्रकारे येत असल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाºया मुलांनी आपल्या भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन राज्यपालांनी केले. आज चीन, कोरियासारख्या देशांना जुन्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या पटकथांविषयी कुतूहल असताना सांस्कृतिक कार्य विभागानेही यात मागे न राहता हिंदीमध्ये रूपांतरण करण्याचे काम करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र