शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शिवस्मारकाच्या उंचीवरून खडाजंगी, विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:25 IST

अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकीच असेल,

विशेष प्रतिनिधीमुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकीच असेल, अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उचलून धरला. या स्मारकाच्या निविदा राज्य सरकारने दिली आहे. यामध्ये महाराजांच्या पुतळ्याची उंची १६० मीटर वरून १२६ मीटर करण्यात आल्याचे समजते. महाराजांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखे आहे. पहिल्या प्रस्तावाला पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असताना, पुन्हा प्रस्ताव बदलण्याची गरज का भासली, असा सवाल पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार या ज्येष्ठ सदस्यांनी या विषयावर चर्चेची मागणी केली. दुसरीकडे भाजपाचे सदस्य आक्रमक होत पुढे आले.शिवरायांच्या स्मारकाचा निर्णय २००१ मध्ये झाला होता, पण त्यास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी २०१७ उजाडावे लागले. १५ वर्षांत तुम्ही काहीही केले नाही. चर्चाच करायची असेल, तर मग तुमच्या काळात शिवरायांवरील चित्रपट का निघाला नाही, रायगड, शिवनेरीसाठी तुम्ही काय केले, याचीही चर्चा करावी लागेल. हिंमत असेल तर चर्चा करा, असे आव्हान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देताच विरोधक अधिक आक्रमक होऊन घोषणा देऊ लागले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर राहणार असून विरोधकांनी स्मारकावरून राजकारण करू नये, असे मुनगंटीवार म्हणाले. तरीही गदारोळ सुरूच राहिल्याने अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आला अन् महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करता, याबद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय हा गंभीर विषय आहे. सरकारने असंवेदनशील दाखवत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप विखे पाटील यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या रचनेत बदल केला जात असल्याने पर्यावरण विभागाची नव्याने परवानगी घ्यावी लागणार असल्याने, स्मारकाचे काम रखडले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.पंतप्रधानांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. त्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला, तर जनता सरकारला माफ करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. आमच्या सरकारने स्मारकाचे काम पुढे नेले. तुम्ही काहीच केले नाही. त्यामुळे तुमच्या पोटात दुखते आहे. या विषयावर तरी राजकारण करू नका, असा टोला तावडे यांनी विरोधकांना हाणला.रचना व उंची गुणोत्तर प्रमाणातविरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले. विरोधकांची सत्ता असताना महाराजांच्या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली. केंद्रातही यांचीच सत्ता होती. मात्र, यांना स्मारकाची एकही वीट रचता आली नाही. हे सरकार जगातले सर्वात उंच स्मारक उभारणार आहे. या स्मारकाची रचना व त्याची उंची ही गुणोत्तर प्रमाणात ठरविण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र