शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यपालांच्या कुलगुरू निवड अधिकारांवर टाच?; कायद्यात सुधारणा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:52 IST

नागपूरच्या कुलगुरू निवडीवरून मंत्रिमंडळात तक्रार

मुंबई : कुलपती म्हणून कुलगुरू निवडीचे राज्यपालांना असलेले अधिकार संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील कायदेशीर बाबींची चाचपणी केली जात असल्याचे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अलिकडेच डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. ते रा. स्व.संघ परिवाराशी संबंधित आहेत आणि भविष्यात त्यांच्याप्रमाणेच अन्य विद्यापीठांच्या कुलगुरुपदीदेखील संघ परिवारातील व्यक्तींची नियुक्ती केली जाऊ शकते.

कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी राज्य शासनाला असले पाहिजेत, अशी आग्रही मागणी नितीन राऊत, सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या तीन मंत्र्यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केल्याची आणि अन्य काही मंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती आहे. यावर, राजभवनला कुलगुरू निवडीचे सर्वाधिकार असू नयेत यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भात कायदेशीर चाचपणी केली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काही प्रसंगांमध्ये संघर्ष झालेला आहे. कुलगुरू निवडीचे राज्यपालांचे अधिकार कमी करण्याच्या हालचालींकडे त्या दृष्टीनेही बघितले जात आहे.संघ विचारांची व्यक्ती असल्याचा आक्षेपपाच सदस्यांच्या समितीने पाच जणांच्या नावाची नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी शिफारस केली होती. त्यातील एकास नियुक्त करण्याचे अधिकार कायद्यानुसार राज्यपालांना असतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाचही जणांची मुलाखत घेऊन डॉ. सुभाष चौधरी यांची निवड केली होती. संघ विचारांच्या व्यक्तींना कुलगुरुपदी नियुक्त केले की मग ते त्याच विचाराने विद्यापीठाचा कारभार करतात आणि पक्षपात करतात असा अनुभव असल्याची तक्रार तीन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे