शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 16, 2017 16:05 IST

सिल्लोड तालुक्यात 88 गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

श्यामकुमार पुरे सिल्लोड, दि. 16 - सिल्लोड तालुक्यात 88 गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 12 गावांत मागणी असूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे टँकर सुरू झाले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. प्रशासनाने 49 गावांत 65 टँकर सुरू केले आहे. 27 गावांत 43 विहिरीचे अधिग्रहण केले आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. बहुतेक गावांतील सार्वजानिक व शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील धरणांची पाणीपातळी कमी झाली आहे. आवश्यक तेथे तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे.यावर्षी विविध मध्यम प्रकल्प व विहिरीतून शेतीसाठी पाणी उपसा झाल्याने बहुतेक धरणाची पाणीपातळी कमालीची घटली आहे. सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चिन्ह दिसत असताना प्रशासनाने 65 टँकर सुरू केले आहेत. अनेक गावांत भुजल सर्वेक्षण अधिकारी यांच्या प्रमाणपत्राअभावी अजूनही टँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून आहे.खेळणा मध्यम प्रकल्प ब्लू सील...सिल्लोड तालुक्यातील धरण व पाणी पातळी अशी:- सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्प ब्लू सील आहे. अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पात केवळ 4.67 टक्के पाणी आहे. केळगाव 4 टक्के, उंडणगाव, रहिमाबाद प्रकल्पात मृतसाठा आहे. सिल्लोड तालुक्यातील या धरणातून अनेक गावात पाणीपुरवठा करण्यात येतो. अजूनही काही धरणातून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. कापूस व मिर्ची लागवडीसाठी मध्यम प्रकल्पांतून होणारा पाणी उपसा थांबविला गेला नाही तर गंभीर प्रश्न निर्माण होईल.49 गावांत 65 टँकर सुरू असलेली गावे अशी:- सिल्लोड तालुक्यातील पळशी, म्हसलाखुर्द, उपळी, लोनवाडी, खातखेडा, धानोरा, दीडगाव, पिम्प्री, वरूड, अनाड, गव्हाली, बोजगाव, रहिमाबाद, तलवाड़ा, पिरोळा, डोईफोडा, टाकलीखुर्द, आसडी, पिंपळगाव घाट, शेखपूर, पालोदवाडी, धावड़ा, डखला, सराटी, बबोदवड, जंजाला, अंधारी, मुखपाठ, पांगरी, बोरगाव सारवनी, सावखेडा, पिंपलदरी वाडा, बालापुर, कायगाव वाडी, पिम्पलगाव पेठ, म्हसला बुद्रुक, निल्लोड वाडी, पिम्पलदरी, वडोदचाथा, पानवडोद, धोत्रा, वडालीटाका, नाटवी, चिंचवन, सिरसाळातांडा, को-हाळातांडा, रेलगाववाडी, कोटनान्द्रा, परदेशीवाडी या 49 गावांत 65 टँकर सुरू आहेत.12 गावांचे प्रस्ताव धूळ खात पडून तालुक्यातील 12 गाव जलकीघाट, जुनापानेवाड़ी, तांडाबाजार, टाकलीजीवरग, उंडंणगाववाडी, घटाम्ब्री, पानस, चिंचखेडा, डोंगरगांव, हट्टी, सोनप्पावाडीचे प्रस्ताव भूजलच्या प्रमाणपत्रासाठी अडकून पडले आहेत. तर वांगी बुद्रुक, प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात मंजुरी अभावी पडून आहे. जनता पाण्यासाठी वन वन भटकंती करीत आहे. तर प्रशासन कागदी घोड़े नाचवून नागरिकांची थट्टा करताना दिसत आहे. वरील गावात तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.