शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, २०० तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 06:09 IST

राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.

पुणे : राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.राज्याच्या कृषी विभागाने पीकपाण्यासंदर्भात तयार केलेल्या अहवालात टंचाईसदृश परिस्थितीचे अनुमान काढले आहे. यंदा ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १४३ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के तर १२१ तालुक्यांत ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.नागपुरात किडीचा प्रादुर्भावनागपूर विभागातील ६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात कापूस पिकावर रस शोषणाºया किडीचा व शेंदरी बोंडअळीचा, भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.विभागनिहाय तालुक्यातील पावसाची स्थितीविभाग तालुके २५ ते ५० ५० ते ७५ ७५ ते १०० १०० पेक्षा जास्तकोकण ४७ -- ०३ २५ १९ तालुकेनाशिक ४० ०५ २२ ११ ०२पुणे ३९ १३ १६ ०४ ०६कोल्हापूर ३३ ०१ ०९ १२ ११औरंगाबाद २८ ०५ २१ ०२ --लातूर ४८ ०३ २६ १३ ०६अमरावती ५६ ०१ २४ २४ ०७नागपूर ६४ -- २२ ३० १२प्रत्येक वेळी केंद्रावर अवलंबून राहावे लागतेवेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने ‘दुष्काळ’ शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जनावरांना चारा-पाण्याची सोय करावी. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे.- बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWaterपाणी