शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, २०० तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 06:09 IST

राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.

पुणे : राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.राज्याच्या कृषी विभागाने पीकपाण्यासंदर्भात तयार केलेल्या अहवालात टंचाईसदृश परिस्थितीचे अनुमान काढले आहे. यंदा ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १४३ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के तर १२१ तालुक्यांत ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.नागपुरात किडीचा प्रादुर्भावनागपूर विभागातील ६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात कापूस पिकावर रस शोषणाºया किडीचा व शेंदरी बोंडअळीचा, भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.विभागनिहाय तालुक्यातील पावसाची स्थितीविभाग तालुके २५ ते ५० ५० ते ७५ ७५ ते १०० १०० पेक्षा जास्तकोकण ४७ -- ०३ २५ १९ तालुकेनाशिक ४० ०५ २२ ११ ०२पुणे ३९ १३ १६ ०४ ०६कोल्हापूर ३३ ०१ ०९ १२ ११औरंगाबाद २८ ०५ २१ ०२ --लातूर ४८ ०३ २६ १३ ०६अमरावती ५६ ०१ २४ २४ ०७नागपूर ६४ -- २२ ३० १२प्रत्येक वेळी केंद्रावर अवलंबून राहावे लागतेवेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने ‘दुष्काळ’ शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जनावरांना चारा-पाण्याची सोय करावी. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे.- बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWaterपाणी