शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्यात उष्णतेचा कहर कायम, यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 03:44 IST

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे.

यवतमाळ : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघातानेयवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे. आर्णी तालुक्यातील कल्पना शिंदे या उपवर मुलीचा उपचरादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. तर येथील वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह बुधवारी आढळून आला.

आर्णी तालुक्यातील भंडारी (जहागीर) येथील रघुनाथ शिंदे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह ठरल्याने परंपरेप्रमाणे देवदर्शनासाठी गेले होते. त्या वेळी प्रवासादरम्यान कल्पनाला उलट्या होऊ लागल्याने तुळजापूर येथे उपचार घेऊन तिने कुटुंबीयांसोबत पुढचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला नांदेड येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान ३० एप्रिलला तिचा मृत्यू झाला. देवदर्शनाला गेलेल्या उपवर मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दुसऱ्या घटनेत वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सिंगलदीप गावाजवळ १ मे रोजी सकाळी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी पाठविला आहे. उष्माघातानेच या महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातYavatmalयवतमाळ