शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उष्णतेने होरपळतोय महाराष्ट्र; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:51 IST

येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा.

मुंबई : राज्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश नोंदविण्यात येत होते. कमाल तापमानात किंचित घसरण झाली असली तरी मुंबईत उकाडा कायम आहे.

 ‘अवकाळी’चे  वातावरण निवळले,  पारा वाढणार संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता जाणवते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगर, अकोला, संगमनेर, शहापूर, जव्हार, मोखाडा तालुक्यातील क्षेत्रात तुरळक ठिकाणी पुढील ४-५ दिवस उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती जाणवू शकते.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

पुढील पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ ते ९ मेदरम्यान राजस्थानात उष्णतेची लाट येईल. ८ ते ९ मे दरम्यान दक्षिण हरियाणा- दिल्ली, दक्षिण - पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र