शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

उष्णतेने होरपळतोय महाराष्ट्र; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:51 IST

येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा.

मुंबई : राज्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश नोंदविण्यात येत होते. कमाल तापमानात किंचित घसरण झाली असली तरी मुंबईत उकाडा कायम आहे.

 ‘अवकाळी’चे  वातावरण निवळले,  पारा वाढणार संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता जाणवते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगर, अकोला, संगमनेर, शहापूर, जव्हार, मोखाडा तालुक्यातील क्षेत्रात तुरळक ठिकाणी पुढील ४-५ दिवस उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती जाणवू शकते.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

पुढील पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ ते ९ मेदरम्यान राजस्थानात उष्णतेची लाट येईल. ८ ते ९ मे दरम्यान दक्षिण हरियाणा- दिल्ली, दक्षिण - पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र