शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्यास धोका

By admin | Updated: February 28, 2017 02:34 IST

दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्याने जवळपास २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला.

वैभव गायकर,पनवेल- खारघरमधील डेल्ली बेल्ली या उघड्यावर सुरू असलेल्या दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्याने जवळपास २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. सर्वोच्च न्यायालयाने उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या विक्रीस बंदी घातली आहे. असे असले तरी त्यांची सर्रास विक्री सुरू असून ते जीवघेणे ठरू शकतात, हे समोर येत आहे. विषबाधा झाल्यानंतर बाधितांपैकी कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे आले नाही. मात्र शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकास अटक केली. डेल्ली बेल्ली या दुकानातून शोरमा व बिर्याणी खाल्ल्याने वीस जणांना विषबाधा झाली असून यात एका तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. रविवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. शिवाय उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट केले. हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षा स्वस्त आणि झटपट खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याने अनेक जण रस्त्यावर, नाक्यानाक्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना पसंती देतात. विनापरवाना सुरू असलेल्या या दुकाने, स्टॉलवरील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. खारघरमधील घटनेनंतर तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. रेल्वे, बस स्थानक, शहरातील मुख्य चौक, सिग्नल्सवर, रस्त्याच्या कडेला विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो गाड्या, दुकाने, स्टॉल्स दिसतात. याठिकाणी कोणतीही नियमावली पाळली जात नाही. शिवाय दर्जाबाबतही शाश्वती नसल्याने आरोग्याशी खेळ होतो. वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी, मिसळपाव, पावभाजी, बिर्याणी, चायनीज आदी दुकानांचा यात समावेश असून पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षा रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर बऱ्याचदा जास्त गर्दी दिसते. उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्यास बाधक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपरिषदेकडून याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र नागरिकांच्या दुर्लक्षामुळे विषबाधेसारखे प्रकार घडतात. सध्या तापमान प्रचंड वाढल्याने खाद्यपदार्थ लवकरच खराब होतात. असे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोट खराब होणे, मळमळ, सर्दी, ताप आदी व्याधी जडत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उघड्यावर अन्नपदार्थ बनवताना अनेकदा घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसतात. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास किंवा गॅसचा भडका झाल्यासही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काही वर्षांपूर्वी चायनीज खाल्ल्याने विषबाधा होऊन ठाण्यातील दोघींना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय अन्नपदार्थांत अळ्या सापडणे, खराब झालेल्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे आदी प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. त्यामुळे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.>खारघरमधील २०-२२ जणांना विषबाधा झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. नागरिकांनी शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, याठिकाणी वापरण्यात येणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे जीवितास धोका उद्भवू शकतो. महापालिकेच्या अधिकारात असलेल्या नियमानुसार खारघरमधील विषबाधाप्रकरणी जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तीव्र कारवाई सुरू करण्यात आली आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त पनवेल महानगरपालिकाहॉटेलमालकाला अटकखारघरमध्ये शोरमा व बिर्याणी खाल्ल्याने २० पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यांच्यावर खारघरमधील विविध खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. खारघर पोलिसांनी याठिकाणी काम करणाऱ्या रईस रफिक शेख याला रविवारी अटक केली, मात्र हॉटेलचा मालक सय्यद जमालुद्दीन खान हा फरार होता. खानला सोमवारी अटक करण्यात आली. खारघरमधील विषबाधेची माहिती आम्ही पनवेल महापालिका, तसेच अन्न व औषध प्रशासनालाही दिली आहे. यामध्ये खारघर परिसरातील दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांची व त्यांच्या उपचारासंदर्भात माहिती आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने उलट्या, सर्दी- खोकला, घसा बसणे, जळजळ आदी आजार उद्भवतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. - डॉ. मनीषा मातकर, अध्यक्ष, खारघर डॉक्टर्स असोसिएशन