शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्यास धोका

By admin | Updated: February 28, 2017 02:34 IST

दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्याने जवळपास २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला.

वैभव गायकर,पनवेल- खारघरमधील डेल्ली बेल्ली या उघड्यावर सुरू असलेल्या दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्याने जवळपास २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. सर्वोच्च न्यायालयाने उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या विक्रीस बंदी घातली आहे. असे असले तरी त्यांची सर्रास विक्री सुरू असून ते जीवघेणे ठरू शकतात, हे समोर येत आहे. विषबाधा झाल्यानंतर बाधितांपैकी कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे आले नाही. मात्र शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकास अटक केली. डेल्ली बेल्ली या दुकानातून शोरमा व बिर्याणी खाल्ल्याने वीस जणांना विषबाधा झाली असून यात एका तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. रविवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. शिवाय उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट केले. हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षा स्वस्त आणि झटपट खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याने अनेक जण रस्त्यावर, नाक्यानाक्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना पसंती देतात. विनापरवाना सुरू असलेल्या या दुकाने, स्टॉलवरील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. खारघरमधील घटनेनंतर तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. रेल्वे, बस स्थानक, शहरातील मुख्य चौक, सिग्नल्सवर, रस्त्याच्या कडेला विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो गाड्या, दुकाने, स्टॉल्स दिसतात. याठिकाणी कोणतीही नियमावली पाळली जात नाही. शिवाय दर्जाबाबतही शाश्वती नसल्याने आरोग्याशी खेळ होतो. वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी, मिसळपाव, पावभाजी, बिर्याणी, चायनीज आदी दुकानांचा यात समावेश असून पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षा रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर बऱ्याचदा जास्त गर्दी दिसते. उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्यास बाधक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपरिषदेकडून याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र नागरिकांच्या दुर्लक्षामुळे विषबाधेसारखे प्रकार घडतात. सध्या तापमान प्रचंड वाढल्याने खाद्यपदार्थ लवकरच खराब होतात. असे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोट खराब होणे, मळमळ, सर्दी, ताप आदी व्याधी जडत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उघड्यावर अन्नपदार्थ बनवताना अनेकदा घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसतात. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास किंवा गॅसचा भडका झाल्यासही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काही वर्षांपूर्वी चायनीज खाल्ल्याने विषबाधा होऊन ठाण्यातील दोघींना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय अन्नपदार्थांत अळ्या सापडणे, खराब झालेल्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे आदी प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. त्यामुळे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.>खारघरमधील २०-२२ जणांना विषबाधा झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. नागरिकांनी शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, याठिकाणी वापरण्यात येणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे जीवितास धोका उद्भवू शकतो. महापालिकेच्या अधिकारात असलेल्या नियमानुसार खारघरमधील विषबाधाप्रकरणी जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तीव्र कारवाई सुरू करण्यात आली आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त पनवेल महानगरपालिकाहॉटेलमालकाला अटकखारघरमध्ये शोरमा व बिर्याणी खाल्ल्याने २० पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यांच्यावर खारघरमधील विविध खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. खारघर पोलिसांनी याठिकाणी काम करणाऱ्या रईस रफिक शेख याला रविवारी अटक केली, मात्र हॉटेलचा मालक सय्यद जमालुद्दीन खान हा फरार होता. खानला सोमवारी अटक करण्यात आली. खारघरमधील विषबाधेची माहिती आम्ही पनवेल महापालिका, तसेच अन्न व औषध प्रशासनालाही दिली आहे. यामध्ये खारघर परिसरातील दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांची व त्यांच्या उपचारासंदर्भात माहिती आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने उलट्या, सर्दी- खोकला, घसा बसणे, जळजळ आदी आजार उद्भवतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. - डॉ. मनीषा मातकर, अध्यक्ष, खारघर डॉक्टर्स असोसिएशन