शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला इंदुरीकर महाराजांना फोन; लसीकरणाबाबत केले प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 23:12 IST

लसीकरणाबाबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन करू असं विधान राजेश टोपेंनी केले.

नाशिक – राज्यभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: हिरारिने प्रयत्न करत आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत किमान प्रत्येक व्यक्तीला एकतरी डोस मिळावा यासाठी राज्य सरकार मोहिम चालवत आहे. कवच कुंडल मोहिमेतंर्गत राज्यातील प्रत्येक घरात जात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेनी(Rajesh Tope) दिली आहे.

त्यातच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राजेश टोपे यांना किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी लसीकरणाबाबत केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राजेश टोपे यांनी मी इंदुरीकर महाराजांना फोन केल्याचं सांगितले. लसीकरणाबाबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन करू असं विधान राजेश टोपेंनी केले. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या फोन केल्यानंतरही इंदुरीकर महाराज लस न घेण्यावर ठाम राहतात की, लसीकरणाबाबत त्यांचे मत परिवर्तन होतं हे पाहावं लागणार आहे.

तसेच इंदुरीकर महाराज उत्तमप्रकारे समाजाचं प्रबोधन करतात. त्यांच्या स्टाईलमधील किर्तनाला जास्त प्रतिसाद मिळतो. जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाबाबत जागरुकता आहे. लस घेणं हे आपलं कवच कुंडल आहे. लसीमुळे आपल्याला कोरोना होणार नाही असं नाही तर कोरोनाचं गंभीर रुप तयार होणार नाही. हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. वैज्ञानिक दृष्टीने या लसीकरणाला महत्त्व आहे. माझे आणि इंदुरीकर महाराजांचे चांगले संबंध आहेत. मी त्यांना समजावून सांगेन असं राजेश टोपेंनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

मन खंबीर ठेवणे हेच कोरोनावरचं औषध आहे. कोरोना झालेल्या माणसांना त्यांच्या घरच्यांनीच जास्त त्रास दिला. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगळी आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी हिंडतो, मी लस घेतली नाही अन् घेणार नाही. काहीच होत नाही मग घ्यायची कशाला? असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेindurikar maharajइंदुरीकर महाराज