शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

नफेखोरीच्या नादात आरोग्याची ऐशीतैशी

By admin | Updated: December 15, 2014 03:45 IST

राज्यातील ३५ शासकीय इस्पितळांमधील रेडिआॅलॉजी विभाग अत्याधुनिक करण्याच्या निर्णयाने सर्वसामान्य रुग्णांच्या आशा पालवल्या होत्या

यदु जोशी, नागपूरराज्यातील ३५ शासकीय इस्पितळांमधील रेडिआॅलॉजी विभाग अत्याधुनिक करण्याच्या निर्णयाने सर्वसामान्य रुग्णांच्या आशा पालवल्या होत्या. त्यासाठी दोन बड्या कंपन्यांना २६४ कोटी रुपयांचे कंत्राट आरोग्य विभागाने सरकारी व खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) दिले खरे, पण आता या कंपन्यांनी हे काम आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे कारण देत हात वर केल्याने किफायतशीर दरांतील सेवांना सर्वसामान्य वंचित राहिले आहेत.या कंपन्यांनी हे काम अन्य बड्या कंपन्यांकडे वळवून अधिक आर्थिक लाभ मिळविण्याच्या हालचाली सुरू असल्याने योजनेच्या अंमलबजावणीत टाळाटाळ केली जात असल्याचे म्हटले जाते. दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय इस्पितळांमधील रेडिआॅलॉजी विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठीही योजना होती. सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, मॅमोग्राफी मशीन, ओझोन थेरपी, थ्रीडी कलर डॉप्लर अशा आधुनिकमशीन्स या विभागांमध्ये आणायच्या आणि त्याचा लाभ रुग्णांना द्यायचा, अशी ही योजना होती. संपूर्ण राज्यात एका वर्षात ३ कोटी रुग्णांंना या योजनेचा फायदा झाला असता, पण योजना अमलातच आलीच नाही.विदर्भातील १३ (अमरावती- २, बुलडाणा - २, अकोला, नागपूर, गडचिरोली, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा) आणि मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील २२ इस्पितळांमध्ये हे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार होते. विदर्भासाठीचे कंत्राट फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. कंपनीने पुढील १० वर्षांत हे मशीन्स चालवावेत आणि त्यासाठी १०४ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी. कंपनी १३ इस्पितळांसाठी सरकारला वार्षिक ५ लाख रुपये नाममात्र शुल्क द्यायचे, बीपीएलचे रुग्ण, आजी-माजी आमदार, खासदार, शासकीय कर्मचाऱ्यांसह १९ प्रकारच्या कॅटेगिरींना मोफत उपचार द्यावेत, राजीव गांधी जीवनदायी योजनेतील रुग्णांना केंद्रीय आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) निश्चित केलेल्या दरानुसार लाभ द्यावा आणि अन्य कॅटेगिरींकडून (एपीएलसह) बाजार दराने सुविधा उपलब्ध करावी, अशा अटी व शर्ती निविदेत होत्या.राज्याच्या अन्य भागांतील २२ इस्पितळांमध्ये रेडिआॅलॉजी विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्याचे कंत्राट जवळपास याच पद्धतीने विप्रो-जीई या कंपनीला देण्यात आले. त्यासाठी विप्रो-जीईला १६४ कोटी रुपयांची गुंतवणूक करावयाची होती. संपूर्ण राज्यात केवळ पुणे जिल्ह्णांतील औंध येथील रेडिआॅलॉजी विभागाचे अत्याधुनिकीकरण होऊशकले. तेही कंपनीने अन्य एका कंपनीला विभाग चालवायला दिला. दोन्ही कंपन्या आपले कंत्राट अन्य एखाद्या बड्या हॉस्पिटलकडे वा आरोग्य क्षेत्रातील कंपनीकडे वळविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे म्हटले जाते. विप्रो-जीईने आरोग्य विभागाशी करार तरी केला पण फिलिप्स कंपनीने अद्याप करारदेखील केलेला नाही. ही योजना बनविताना योग्य तांत्रिक सल्लागारांचा आरोग्य विभागाकडे अभाव असल्याने योजनेचा बोजवारा उडाला, असेही बोलले जाते. कंत्राटाची अंमलबजावणी करण्यास विलंब लावणाऱ्या दोन्ही कंपन्या बड्या असल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे धाडस आरोग्य विभाग दाखवू शकलेला नाही आणि अजून केवळ त्या बाबत केवळ इशाराच दिला जात आहे.