शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, भ्रष्टाचारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला", राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:21 IST

Rahul Gandhi Criticize Narendra Modi: चुकीचे केल्यानंतरच माफी मागितली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली; मात्र त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचीही माफी मागितली पाहिजे, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

- हणमंत पाटील, अविनाश कोळीकडेगाव (जि. सांगली)  - मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळेच कोसळला. चुकीचे केल्यानंतरच माफी मागितली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली; मात्र त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचीही माफी मागितली पाहिजे, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

कडेगाव येथे दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.   राहुल गांधी म्हणाले, पतंगराव कदम यांनी ६० वर्षे पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी आयुष्यात कधी माफी मागितली नाही; कारण चुकीचे काम केले तरच माफी मागावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर कोणत्या कारणाने पंतप्रधान यांनी माफी मागितली? पहिले कारण म्हणजे आरएसएसच्या व्यक्तीला कंत्राट दिले. त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले. चुकीच्या व्यक्तीला काम दिल्याने आणि भ्रष्टाचार झाल्याने पुतळा कोसळला. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी.

देशात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. धर्माधर्मांत, जातीजातींत आणि भाषेवरून वाद निर्माण करून त्यांना द्वेष पसरवायचा आहे. या विचारधारेविरुद्ध आमची लढाई आहे, असे गांधी म्हणाले.

पतंगराव कदम यांचे योगदान मोलाचे : शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या  शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी, शिक्षणतज्ज्ञांनी मोठे योगदान दिले. यात आधुनिक काळात पतंगराव कदम यांचे योगदानही मोलाचे आहे. 

महाराष्ट्र गहाण ठेवू नका : खरगे मतांसाठी ‘लाडकी बहीण’चे आमिष दाखविले आहे. जनतेने दीड ते दोन हजार रुपयांसाठी नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू नये. त्यांच्या पैशाला ठोकर मारून संविधान संपवू पाहणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केले.

सोनिया गांधींशी भावनिक नाते : कदमदेशाच्या स्वराज्याची लढाई सांगलीतून सुरू झाली, याचा अभिमान आहे. सोनिया गांधी यांच्याशी कदम कुटुंबाचे भावनिक नाते आहे, अशी भावना डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविकात बोलून दाखविली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी