शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 08:24 IST

हाथरस चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी; घातपाताची शक्यता

राजेंद्र कुमारहाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १२१वर पोहोचली असून. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही दुर्घटना घडविण्याचा कट आखण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.

सत्संगासाठी ८० हजार लोकांनाच परवानगी असताना प्रत्यक्षात अडीच लाख लोक तिथे आले होेते, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केली आहे.  हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फ भोलेबाबांचा सत्संग होता. सत्संग झाल्यानंतर भोलेबाबा निघाले, तेव्हा त्यांच्या पायाखालची माती घेण्यास भाविक पुढे सरसावले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी हाथरस येथे जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोपहाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील बहुतांश मृत व्यक्तींची ओळख पटली असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले की, सत्संगाला नेमके किती लोक आले, याचा खरा आकडा आयोजकांनी सांगितला नव्हता. अशा प्रकारे त्यांनी पुरावे दडविण्याचे काम केले. 

एफआयआरमध्ये भोलेबाबांचा उल्लेख नाहीचेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला पोलिस किंवा स्थानिक प्रशासन जबाबदार नाही. मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर व आयोजकांपैकी आणखी काही जणांची नावे एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. मात्र त्यात भोलेबाबांचा उल्लेख केलेला नाही.