शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हंगामापूर्वीच शेतमालाच्या खरेदीचे धोरण ठरविणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 02:34 IST

जळगाव जामोद येथे बुलडाणा जिल्हा आढावा बैठक; तूर खरेदी प्रक्रिया आठवड्याभरात.

प्रा. नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद (जि. बुलडाणा): येत्या खरीप हंगामासाठी शेतमालाच्या खरेदीसंदर्भातील धोरण हंगामापूर्वीच जाहीर केले जाईल. त्यामुळे शासनाकडून खरेदी केल्या जाणार असलेल्या शेतमालाची माहिती शेतकर्‍यांना आधीच मिळेल. परिनामी शेतकर्‍यांना शेतमालाचे योग्य नियोजन करता येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. प्रतापराव जाधव, आ.डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ. राहुल बोंद्रे, आ. शशिकांत खेडेकर, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.शासनाने आतापर्यंंतची सर्वात मोठी शेतमाल खरेदी तुरीच्या स्वरूपात केली आहे. यावर्षी विक्रमी तूर खरेदी करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शासकीय खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या तुरीची संपूर्ण खरेदी शासन करणार आहे. येत्या आठवड्यात ही तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वजनकाटे व मनुष्यबळ वाढवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शेतकर्‍यांना कृषी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या राष्ट्रीयीकृत बँकांविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांनी फौजदारी कारवाई करावी, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित केले; त्याचे मुख्यमंत्र्यांनी त्वरित निराकरण केले. बैठकीत सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले, तर प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जीगाव प्रकल्पाचा मुख्यमंत्री वार रूममध्ये समावेश- घाटाखालील सहा तालुक्यांसाठी जिगाव प्रकल्प हा त्वरित पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश मुख्यमंत्री वार रूममध्ये केला असून, या प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊन, सहा तालुक्यांतील सुमारे ८४ हजार हेक्टर शेतजमीन ही ओलिताखाली येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. गटशेतीवर भर! -खारपाणपट्टय़ातील शेतीचा विकास करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आढावा सभेत दिली. या पट्टय़ातील व अन्य भागासाठी गट शेतीचा पर्यायसुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. किमान २0 शेतकर्‍यांनी एकत्र येऊन किंवा १00 एकरांचा गट बनवून गट शेती करावी, अशा शेतीला शासनाच्या कृषी विकासाच्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ११५ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई-अनुचित प्रकार करू नये म्हणून ११५ जणांवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. यामध्ये ९९ पुरुष व १६ महिलांचा समावेश होता. शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा प्रामुख्याने स्थानबद्ध करण्यात आलेल्यांमध्ये समावेश होता.