शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

उन्हाचा कडाका अन् पावसाचा तडाखा! यवतमाळ ४६ अंशावर विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:52 IST

चाळीस डिग्रीच्या आतील शहरांमध्ये पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा, मुंबई, रत्नागिरी, बुलढाणा यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सूर्य आग ओकत असल्याने महाराष्ट्र चांगलाच तापू लागला असून अकोला, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर ही शहरे सर्वांत उष्ण ठरत आहेत. येथील कमाल तापमान ४५ अंशांवर गेले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी राज्यात यवतमाळला उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नैर्ऋत्य मान्सूनची वाटचाल बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य, मध्य व ईशान्य भागात झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस, तर मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत  देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले. पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढत आहे.

राज्यातील कमाल तापमान

  • यवतमाळ    ४६.०
  • अकोला    ४५.२
  • गोंदिया    ४४.४
  • अमरावती    ४४.२
  • वर्धा    ४४.१
  • परभणी    ४४.०
  • नांदेड    ४३.५
  • वाशिम    ४३.४
  • चंद्रपूर    ४३.२
  • नागपूर    ४२.४
  • बीड    ४२.०
  • छ. संभाजीनगर  ४१.८
  • जळगाव    ४०.७
  • मालेगाव    ४०.४
  • सोलापूर    ४०.४
  • धाराशिव    ३९.४
  • चाळीसच्या आतील शहरे: पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा, मुंबई, रत्नागिरी, बुलढाणा.

राजस्थान, पंजाब आणि विदर्भातील काही शहरांत उष्णतेची लाट आहे. अकोल्यात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येणार आहे. तापमानामुळे  कलम १४४ लागू होणे हे पहिल्यांदाच ऐकत आहे. अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही, परंतु नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या सूचना दिल्या असाव्यात.- डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलYavatmalयवतमाळPuneपुणेMumbaiमुंबई