शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

हरित महाराष्ट्र अभियानाला पावसाचा खोडा!

By admin | Updated: July 7, 2015 00:00 IST

वृक्षरोपणाला अल्प प्रतिसाद; वनाच्छादनाखालील जमीन वाढविण्यासाठी प्रयत्न.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या हेतूने वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी हरित महाराष्ट्र अभियान श्रमदानातून राबविण्यात येत आहे. यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे; मात्र पावसाने दडी दिल्याने या सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ३३ टक्के भूभाग वनाच्छादनाखाली असणे आवश्यक असताना हे क्षेत्र केवळ १६ टक्के एवढे आहे. त्यातही चांगले आणि मध्यम दर्जाचे वनाच्छादन फक्त ९.६ टक्क्य़ांपर्यंत र्मयादित आहे. ३३ टक्क्यांपर्यंत वनाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यात हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महापालिका, नगरपरिषद आदींच्या सहकार्याने रस्ते, गावठाण, गावातील मोकळ्या जागा, गावातील शाळेचा परिसर, बाजापेठ, प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आदी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार होते; मात्र पाऊस नसल्यामुळे या अभियानाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.

*वृक्षारोपणाला अल्प प्रतिसाद

        या अभियानातंर्गंत झाडे स्वस्त दरात विक्री, वितरण करण्याकरिता शहर, गावांच्या अनेक भागात वाहनाद्वारे फिरती विक्री करण्याचे सुचवण्यात आले आहे. याशिवाय रोप विकत घेणार्‍यांना पुढील वर्षी कुठल्या वृक्षप्रजाती किती संख्येत लागतील, याची मागणी व नागरिकांचा अभिप्रायही नोंदविला जाणार होता; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपे घेणार्‍यांची व वृक्षारोपण करणार्‍यांची संख्या अल्प असल्याचे दिसून येत आहे.