शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

हरित महाराष्ट्र अभियानाला पावसाचा खोडा!

By admin | Updated: July 7, 2015 00:00 IST

वृक्षरोपणाला अल्प प्रतिसाद; वनाच्छादनाखालील जमीन वाढविण्यासाठी प्रयत्न.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या हेतूने वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी हरित महाराष्ट्र अभियान श्रमदानातून राबविण्यात येत आहे. यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे; मात्र पावसाने दडी दिल्याने या सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ३३ टक्के भूभाग वनाच्छादनाखाली असणे आवश्यक असताना हे क्षेत्र केवळ १६ टक्के एवढे आहे. त्यातही चांगले आणि मध्यम दर्जाचे वनाच्छादन फक्त ९.६ टक्क्य़ांपर्यंत र्मयादित आहे. ३३ टक्क्यांपर्यंत वनाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यात हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महापालिका, नगरपरिषद आदींच्या सहकार्याने रस्ते, गावठाण, गावातील मोकळ्या जागा, गावातील शाळेचा परिसर, बाजापेठ, प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आदी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार होते; मात्र पाऊस नसल्यामुळे या अभियानाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.

*वृक्षारोपणाला अल्प प्रतिसाद

        या अभियानातंर्गंत झाडे स्वस्त दरात विक्री, वितरण करण्याकरिता शहर, गावांच्या अनेक भागात वाहनाद्वारे फिरती विक्री करण्याचे सुचवण्यात आले आहे. याशिवाय रोप विकत घेणार्‍यांना पुढील वर्षी कुठल्या वृक्षप्रजाती किती संख्येत लागतील, याची मागणी व नागरिकांचा अभिप्रायही नोंदविला जाणार होता; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपे घेणार्‍यांची व वृक्षारोपण करणार्‍यांची संख्या अल्प असल्याचे दिसून येत आहे.