शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

कट्टर डाव्या संघटना रडारवर! गृह विभागाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:31 IST

कोरेगाव भीमा येथील दंगल व त्यानंतर राज्यभरात झालेला हिंसाचार घडण्यामागे कट्टर डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा हातभार असल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह पूर्ण देशभर त्यांच्याकडून सामाजिक तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे.

- जमीर काझीमुंबई : कोरेगाव भीमा येथील दंगल व त्यानंतर राज्यभरात झालेला हिंसाचार घडण्यामागे कट्टर डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा हातभार असल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह पूर्ण देशभर त्यांच्याकडून सामाजिक तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. या संभाव्य प्रकारास प्रतिबंध घालण्यासाठी गृह विभागाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत उपाययोजना व ठोसकृती कार्यक्रम निश्चित केलाजाईल, असे गृह विभागातील उच्च पदस्थ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.कट्टर डाव्या विचारसरणी असलेल्या संघटना व त्यांचे कार्यकर्ते केंद्र व राज्य सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी जातीय दुही निर्माण करण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी नक्षलवादी संघटनाही मदत करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नबिकट होण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.गेल्या साडेतीन वर्षांपासून केंद्रात व राज्यात उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे सरकार कार्यरत आहे. त्यांच्याकडून विविध निमित्ताने अल्पसंख्याक व दलित वर्गाला ‘टार्र्गेट’ केले जात असून भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था मोडकळीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा प्रचार करत समाजात जातीय दुही निर्माण करण्याचा डाव्या संघटनांचा डाव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातून पुढे २०१९ साली होणाºया लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दलित व अल्पसंख्याक समाजांमध्ये राज्यकर्त्यांबाबत द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कट्टर डाव्या विचारणीचे लोक करत असल्याचा निष्कर्ष वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचा आहे. १ जानेवारीला कोरेगाव भीमा दंगल व त्यानंतर राज्यभरात झालेल्या हिंसाचाराच्या घटना हे त्याचेच प्रतिबिंब असल्याचा दाखला त्यासाठी देण्यात येत आहे. या कट्टर डाव्यांना नक्षलवादी संघटना मदत करत असल्याचे पोलीस अधिकाºयांचे मत आहे. येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडून या प्रकाराची व्याप्ती वाढण्याच्या शक्यतेमुळे त्यास ठोस प्रतिबंधासाठी गृह विभागाकडून राज्यव्यापी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.गृह खात्याची धुरा सांभाळणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्याबाबत बैठक घेऊ न त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे गृह विभागातील अतिवरिष्ठ अधिकाºयाकडून सांगण्यात आले.न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रतीक्षाकोरेगाव भीमा येथील दंगलीची चौकशी न्यायाधीशांमार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र या घटनेला आता महिना होत आला तरी चौकशी समितीची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. ही समिती स्थापन झाल्यास त्यांच्याकडे पोलिसांचा तपासणी अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.जिग्नेश, कन्हैया, खालीद ‘टार्गेट’गुजरातमधील अपक्ष आमदार व दलित युवानेता जिग्नेश मेवानी, ‘जेएनयू’चे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार, उमर खालीद हे महाराष्टÑासह देशभरात विविध ठिकाणी रॅली, सभा व चर्चासत्रे आयोजित करीत राज्यकर्त्यांविरुद्ध जनमत संघटित करीत आहेत. त्यासाठी हे नेते प्रामुख्याने जातीय विद्वेषाचा आधार घेत असल्याने ते पोलिसांच्या ‘टार्गेट’वर आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तचर यंत्रणेकडून बारीक नजर ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र