शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीपेक्षा आनंदी शहरे आवश्यक

By admin | Updated: May 7, 2017 04:25 IST

‘देशात शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्यापेक्षा आनंदी शहरे निर्माण करायला हवीत. स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांना हवे ते

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘देशात शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्यापेक्षा आनंदी शहरे निर्माण करायला हवीत. स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांना हवे ते करतील. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मते कुणीच विचारणार नाही. त्यांच्या हातात तुमचा ‘आत्मा’ द्यायचा की नाही, ही तुमची निवड आहे,’ अशा शब्दांत जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञ-संशोधक डॉ. सॅम पित्रोदा यांनी स्मार्ट सिटी योजनेवर टीका केली. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘इंटरनेट अँड फ्युचर वर्ल्ड आॅर्डर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. फाईव्ह एफ वर्ल्डचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.इंटरनेट, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढणार आहे; पण त्याला आपण रोखू शकत नाही. उलट, त्यादृष्टीने प्रत्येकाने सज्ज राहायला हवे. या बदलांचा स्वीकार करीत स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. इतकी वर्षे होऊनही भारताचे स्वत:चे सर्च इंजिन नाही.’’ कोट्यवधी लोक फेसबुक, टिष्ट्वटरचा वापर करीत आहेत; पण त्याचे सर्व्हर दुसऱ्या देशात आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे, अशी खंतही डॉ. पित्रोदा यांनी व्यक्त केली. इंटरनेटचा वाढलेला वापर विस्मयकारकडॉ. पित्रोदा म्हणाले, ‘‘आज जगभरात इंटरनेटचा वाढलेला वापर हा विस्मयकारक असून गेल्या अनेक दशकांत झालेला या क्षेत्राचा विस्तार महत्त्वाचा आहे. हा विस्तार लक्षात घेत इंटरनेटद्वारे केवळ भारतीयच जगभरात बदल घडवू शकतात. मात्र, असे असले तरी स्वत:ची क्षमता ओळखण्यासाठी आपण असमर्थ आहेत. आज दैनंदिन जीवनाशी निगडित जवळजवळ प्रत्येक गोष्टीशी इंटरनेट जोडले गेले आहे. काही वर्षांआधी अमेरिका हा याच तंत्रज्ञानामुळे विकसित देश समजला जायचा; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भारतातही इंटरनेटचा झालेला प्रसार हा वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे आज असलेली लोकसंख्या आणि साधने यांचा विचार केला, तर इंटरनेट क्षेत्रात आपण भारतीयच बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास आहे. मात्र, हे होत असताना या क्षेत्रात नवीन मॉडेल आणणे गरजेचे असून ते आणण्याची क्षमता असूनदेखील ती कृती करण्यासाठी आपण असमर्थ आहोत, हेही आपल्याला जाणून घ्यायला हवे.’’