शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी कारणे पुरेशी नाहीत, सत्र न्यायालयाने सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 02:27 IST

प्रथमदर्शनी, या टप्प्यावर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप बनत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी घटनेने अधिकार दिलेल्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्याची   निःसंशयपणे  मर्यादा ओलांडली आहे. परंतु, केवळ अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांची अभिव्यक्ती हे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यास पुरेसे कारण असू शकत नाही, असे म्हणत मुंबई सत्रन्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या या जोडप्याच्या घोषणेचा ‘हिंसक मार्गाने सरकारचा पाडाव करण्याचा’ हेतू नव्हता आणि त्यांची विधाने ‘दोषपूर्ण’ असली तरी, त्यांना इतके लांबवता येणार नाही, की ती विधाने ‘राजद्रोहा’च्या कक्षेत आणता येतील, असे निरीक्षण न्या. राहुल रोकडे यांनी नोंदविले.

प्रथमदर्शनी, या टप्प्यावर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप बनत नाही, असे न्यायालयाने म्हटले. राणा दाम्पत्याच्या भाषणांच्या ट्रान्स्क्रिप्टची नोंद घेत न्यायालयाने म्हटले की, निःसंशयपणे, अर्जदारांनी संविधानाने बहाल केलेल्या  भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमा ओलांडल्या आहेत. अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांची अभिव्यक्ती हे आयपीसी कलम १२४ अ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींचा वापर करण्यासाठी पुरेसे कारण असू शकत नाही.

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केल्यावर २३ एप्रिल रोजी पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. ‘कलम १२४ अ’  हे प्रशासन चालविणाऱ्या  व्यक्तींवर टीकेसाठी किंवा त्यांच्या सुधारणा किंवा बदलाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या उपाययोजनांबद्दल कठोर शब्दांत नापसंती व्यक्त करणाऱ्यांवर दंड म्हणून लावू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. हिंसाचाराद्वारे अस्वस्थता निर्माण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही घोषणा (हनुमान चालिसा) करण्यात आली होती, असे  सरकारी वकिलांचे म्हणणे नाही, असे न्यायालयाने म्हटले.

राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वागावे

  • या घोषणेची कोणत्याही प्रकारे हिंसक मार्गाने सरकारचा पाडाव करण्याची प्रवृत्ती नाही किंवा सरकारबद्दल द्वेष, असंतोष किंवा तिरस्कार निर्माण करण्याचाही हेतू नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
  • ‘शांतता प्रस्थापित करण्यात राजकीय नेते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारे त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यामुळे राजकीय नेते व अन्य सार्वजनिक व्यक्तींनी अतिशय जबाबदारीने वागावे’, असे न्यायालयाने म्हटले. 
  • अर्जदाराने कोणालाही शस्त्र बाळगण्यास सांगितले नव्हते किंवा त्यांच्या भाषणामुळे कुठेही हिंसा घडली नाही, असे म्हणत न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज मंजूर केला.
टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाHigh Courtउच्च न्यायालय