शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी कारणे पुरेशी नाहीत, सत्र न्यायालयाने सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 02:27 IST

प्रथमदर्शनी, या टप्प्यावर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप बनत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी घटनेने अधिकार दिलेल्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्याची   निःसंशयपणे  मर्यादा ओलांडली आहे. परंतु, केवळ अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांची अभिव्यक्ती हे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यास पुरेसे कारण असू शकत नाही, असे म्हणत मुंबई सत्रन्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या या जोडप्याच्या घोषणेचा ‘हिंसक मार्गाने सरकारचा पाडाव करण्याचा’ हेतू नव्हता आणि त्यांची विधाने ‘दोषपूर्ण’ असली तरी, त्यांना इतके लांबवता येणार नाही, की ती विधाने ‘राजद्रोहा’च्या कक्षेत आणता येतील, असे निरीक्षण न्या. राहुल रोकडे यांनी नोंदविले.

प्रथमदर्शनी, या टप्प्यावर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप बनत नाही, असे न्यायालयाने म्हटले. राणा दाम्पत्याच्या भाषणांच्या ट्रान्स्क्रिप्टची नोंद घेत न्यायालयाने म्हटले की, निःसंशयपणे, अर्जदारांनी संविधानाने बहाल केलेल्या  भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमा ओलांडल्या आहेत. अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह शब्दांची अभिव्यक्ती हे आयपीसी कलम १२४ अ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींचा वापर करण्यासाठी पुरेसे कारण असू शकत नाही.

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केल्यावर २३ एप्रिल रोजी पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. ‘कलम १२४ अ’  हे प्रशासन चालविणाऱ्या  व्यक्तींवर टीकेसाठी किंवा त्यांच्या सुधारणा किंवा बदलाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या उपाययोजनांबद्दल कठोर शब्दांत नापसंती व्यक्त करणाऱ्यांवर दंड म्हणून लावू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. हिंसाचाराद्वारे अस्वस्थता निर्माण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही घोषणा (हनुमान चालिसा) करण्यात आली होती, असे  सरकारी वकिलांचे म्हणणे नाही, असे न्यायालयाने म्हटले.

राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वागावे

  • या घोषणेची कोणत्याही प्रकारे हिंसक मार्गाने सरकारचा पाडाव करण्याची प्रवृत्ती नाही किंवा सरकारबद्दल द्वेष, असंतोष किंवा तिरस्कार निर्माण करण्याचाही हेतू नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
  • ‘शांतता प्रस्थापित करण्यात राजकीय नेते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारे त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यामुळे राजकीय नेते व अन्य सार्वजनिक व्यक्तींनी अतिशय जबाबदारीने वागावे’, असे न्यायालयाने म्हटले. 
  • अर्जदाराने कोणालाही शस्त्र बाळगण्यास सांगितले नव्हते किंवा त्यांच्या भाषणामुळे कुठेही हिंसा घडली नाही, असे म्हणत न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज मंजूर केला.
टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाHigh Courtउच्च न्यायालय