शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामांच्या धोरणावरच हातोडा!

By admin | Updated: March 25, 2017 03:01 IST

बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारचे धोरण अयोग्य असून, उच्च न्यायालयाने या धोरणाला मंजुरी देण्यास शुक्रवारी नकार दिला.

मुंबई : बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारचे धोरण अयोग्य असून, उच्च न्यायालयाने या धोरणाला मंजुरी देण्यास शुक्रवारी नकार दिला. यामुळे अनधिकृत झोपड्यांपाठोपाठ बेकायदा इमारती नियमित करण्याचे राज्य सरकारचे स्वप्न भंगले आहे. राज्य सरकारने अनधिकृत झोपड्यांना कायद्यांतर्गत संरक्षण दिले. आता सरकारला बेकायदा इमारतींनाही संरक्षण द्यायचे आहे. मात्र, अशा इमारतींमधील रहिवाशांना सदनिका खरेदी करण्यापूर्वीच बांधकाम बेकायदा असल्याचे माहिती होते. त्यामुळे अशा लोकांना दिलासा देऊ शकत नाही. राज्य सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे ठरविण्यापूर्वी काहीच विचार केल्याचे दिसत नाही, असे न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने नमूद केले.मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे नियमित केल्याने शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्याची कल्पना आणि त्यासाठी केलेले कायदे व नियम यांनाच हरताळ फासला जाईल. त्यामुळे हे धोरण ‘एमआरटीपी’, ‘डीसीआर’ आणि ‘एमएलआरसी’ या कायद्यांशी विसंगत आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकाम झाले असेल, तर ती जागा हस्तांतरित करून संबंधित बांधकाम नियमित केले जाऊ शकते, असे सरकारने प्रस्तावित केले होते, परंतु उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेतला. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सरकारी जमीन हस्तांतरित करण्यासाठी प्रसिद्धी देणे आणि निविदा मागवणे बंधनकारक आहे. सर्वांनाच या प्रक्रियेमध्ये भाग घेता आला पाहिजे. त्या दृष्टीने प्रस्तावित धोरणातील जमीन हस्तांतरणाची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ चे उल्लंघन करणारी आहे. एखाद्या जागेचे विभाजन करून कोणी बेकायदा बांधकाम केले असल्यास, संबंधित विकासकाकडून मोठा दंड आकारला जाईल, अशी तरतूद धोरणात आहे. हीसुद्धा तरतूद ‘डीसीआर’शी विसंगत आहे,’ असा निर्वाळाही खंडपीठाने दिला. (प्रतिनिधी)तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली-न्यायालयाचा हा निकाल येताच राज्य सरकारने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली केली. सरकारने प्रस्तावित केलेले धोरण महापालिकेस मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त मुंढे यांनी न्यायालयात घेतली होती व न्यायालयाने त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होते. मुंढे यांच्या जागी रामास्वामी एन.यांची नियुक्ती सरकारने केली आहे.- वृत्त/७उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड पाठोपाठ नवी मुंबईतील दिघा येथील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिल्यानंतर, राज्य सरकारने बांधकामे नियमित करण्यास धोरण आखले. मंत्रिमंडळाकडून या धोरणाला मंजुरी मिळाली असली, तरी दिघ्यासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असल्याने सरकारला हे धोरण अंतिम करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक होते. प्रत्येक कलम तरतुदींशी विसंगत-कृषी जमिनीवरील बांधकाम नियमित करण्याची तरतूदही धोरणात आहे, परंतु ‘एमएलआरसी’ अंतर्गत कृषी जमीन अकृषक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे हे धोरण विसंगत आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणात आरक्षण असलेल्या जमिनीवर बेकायदा बांधकाम उभारले, तर संबंधित जमिनीचे आरक्षण बदलून किंवा रद्द करून ती बांधकामे नियमित करण्याची परवानगी आहे. मात्र, ‘एमआरटीपी’मधील तरतुदींमध्ये भूखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला बगल देऊन बेकायदा बांधकामे नियमित केली जाऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले. ‘प्रस्तावित धोरणातील कलम ५ मुळे संबंधित धोरण वरकरणी निरुपद्रवी वाटत असले, तरी धोरणातील प्रत्येक कलम ‘एमआरटीपी’, ’डीसीआर’ आणि ‘एमएलआरसी’ कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहे,’ असेही न्यायमूर्तींनी म्हटले.