शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात

By admin | Updated: February 10, 2015 00:06 IST

स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी

पालकमंत्र्यांनी घेतली स्वाईन फ्लूवर बैठक नागपूर : स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ३० वरून वाढवून ४५ करण्याचा व जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, आमदार डॉ. मिलिंद माने, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे १९ बळी झाले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. स्वाईन फ्लू रुग्णाची निश्चित आकडेवारी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रोज मेडिकल, मेयोसह, महानगरपालिका, आरोग्य विभागाची इस्पितळे व खासगी इस्पितळे नोडल अधिकाऱ्याला सायंकाळी ५ वाजतापूर्वी रिपोर्टिंग करतील. नोडल अधिकारी हा रोजचा अहवाल एकत्र करून तो पालकमंत्री ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व महापौरांना सादर करेल. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी पाच लाख पत्रकांचे वितरणपालकमंत्री म्हणाले, थंडी लांबल्याने व जनजागृतीअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांनी आणि सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती देणारी पाच लाख पत्रके लवकरच वितरित करण्यात येणार आहे. संशयित रुग्णाच्या मदतीसाठी काही फोननंबरही यात देण्यात आले आहेत.स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ४५ होणारमेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ३० खाटा आहेत. त्या वाढवून ४५ करण्यात येतील. पुढील वर्षात यात १५ खाटा वाढवून ६० करण्यात येणार आहेत. या वॉर्डाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.