शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात

By admin | Updated: February 10, 2015 00:06 IST

स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी

पालकमंत्र्यांनी घेतली स्वाईन फ्लूवर बैठक नागपूर : स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ३० वरून वाढवून ४५ करण्याचा व जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, आमदार डॉ. मिलिंद माने, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे १९ बळी झाले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. स्वाईन फ्लू रुग्णाची निश्चित आकडेवारी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रोज मेडिकल, मेयोसह, महानगरपालिका, आरोग्य विभागाची इस्पितळे व खासगी इस्पितळे नोडल अधिकाऱ्याला सायंकाळी ५ वाजतापूर्वी रिपोर्टिंग करतील. नोडल अधिकारी हा रोजचा अहवाल एकत्र करून तो पालकमंत्री ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व महापौरांना सादर करेल. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी पाच लाख पत्रकांचे वितरणपालकमंत्री म्हणाले, थंडी लांबल्याने व जनजागृतीअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांनी आणि सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती देणारी पाच लाख पत्रके लवकरच वितरित करण्यात येणार आहे. संशयित रुग्णाच्या मदतीसाठी काही फोननंबरही यात देण्यात आले आहेत.स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ४५ होणारमेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ३० खाटा आहेत. त्या वाढवून ४५ करण्यात येतील. पुढील वर्षात यात १५ खाटा वाढवून ६० करण्यात येणार आहेत. या वॉर्डाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.