शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
2
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
3
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
4
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
5
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
6
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
7
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
8
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
9
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
10
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
11
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
12
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
13
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
14
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
15
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
16
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
17
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
18
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
19
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्र्यांचा पाणउतारा

By admin | Updated: September 17, 2016 03:39 IST

कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले

मोखाडा : कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘आले का फोटो काढायला!’ असा संतप्त सवाल सागरच्या आई व आजीने विचारून मंत्रीमहोदयांचा अक्षरश: पाणउतारा केला. दारातच असा पाणउतारा झाल्याने मंत्रीमहोदयांना आपल्या ताफ्यासह माघारी परतावे लागले.३० आॅगस्ट रोजी सागरचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. हा प्रकार आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटूनही कुपोषणबळी कुटुंबाकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. गुरुवारी सकाळी उशिरा पालकमंत्र्यांनी खोचगावातील पीडित कुटुंबीयांना भेट दिली. परंतु, या वेळी पालकमंत्र्यांना मृत सागरच्या आई व आजीने दारातच अडवले व जाब विचारला. यामुळे ताफ्यासह आलेल्या पालकमंत्र्यांना दारातूनच माघारी परतावे लागले. यानंतर, पालकमंत्र्यांनी खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणबळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नंतर, मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट न देता जव्हारकडे रवाना झाले. सागर वाघ हा श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या बालसंजीवन छावणीमध्ये उपचार घेत होता. सरकारने व्हीसीडीसी ही कुपोषण निर्मूलन व सकस आहार देणारी योजना सुरू केल्याची घोषणा केली आणि सागरचे पालक त्याला घरी घेऊन आले. मात्र, सरकारची योजना कागदावरच राहिली आणि त्यानंतर उपचाराअभावी सागरचा मृत्यू झाला. पालकमंत्र्यांच्या उशिरा हजेरीमुळे श्रमजीवीचे विजय जाधव, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडू मालक, संतोष धिंडा, गणेश माली यांनी काळ्या फिती लावून पालकमंत्र्यांचा निषेध केला. या वेळी गेल्या वर्षभरात ६०० बालके कुपोषणाने मरण पावली आहेत. आपण काय केले, असा सवाल विचारताच पालकमंत्र्यांचा तोल गेला. सवरा म्हणाले, ‘मेली, मग काय झाले, असू देत ना, बघू आम्ही करू काय ते’ अशी मुक्ताफळे उधळली.गावात एकाही मंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाहीआता आम्ही सगळ्यांनी मिळून निर्धार केला की, आता आदिवासींची थट्टा पुरे. नुसते दौरे अन् भेटी नको. जोपर्यंत पालघर जिल्ह्यातील बालविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व रिक्त पदे भरत नाही, शून्य ते ६ वयोगटांतील प्रत्येक बालकाला पोषक आहार मिळत नाही, प्रत्येक गरोदर मातेला गरोदर काळापासून पोषक आणि चौरस आहार मिळत नाही, तोपर्यंत गावात एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही.- पांडू मालक,सरपंच, खोच ग्रामपंचायत