शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्र्यांचा पाणउतारा

By admin | Updated: September 17, 2016 03:39 IST

कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले

मोखाडा : कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘आले का फोटो काढायला!’ असा संतप्त सवाल सागरच्या आई व आजीने विचारून मंत्रीमहोदयांचा अक्षरश: पाणउतारा केला. दारातच असा पाणउतारा झाल्याने मंत्रीमहोदयांना आपल्या ताफ्यासह माघारी परतावे लागले.३० आॅगस्ट रोजी सागरचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. हा प्रकार आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटूनही कुपोषणबळी कुटुंबाकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. गुरुवारी सकाळी उशिरा पालकमंत्र्यांनी खोचगावातील पीडित कुटुंबीयांना भेट दिली. परंतु, या वेळी पालकमंत्र्यांना मृत सागरच्या आई व आजीने दारातच अडवले व जाब विचारला. यामुळे ताफ्यासह आलेल्या पालकमंत्र्यांना दारातूनच माघारी परतावे लागले. यानंतर, पालकमंत्र्यांनी खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणबळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नंतर, मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट न देता जव्हारकडे रवाना झाले. सागर वाघ हा श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या बालसंजीवन छावणीमध्ये उपचार घेत होता. सरकारने व्हीसीडीसी ही कुपोषण निर्मूलन व सकस आहार देणारी योजना सुरू केल्याची घोषणा केली आणि सागरचे पालक त्याला घरी घेऊन आले. मात्र, सरकारची योजना कागदावरच राहिली आणि त्यानंतर उपचाराअभावी सागरचा मृत्यू झाला. पालकमंत्र्यांच्या उशिरा हजेरीमुळे श्रमजीवीचे विजय जाधव, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडू मालक, संतोष धिंडा, गणेश माली यांनी काळ्या फिती लावून पालकमंत्र्यांचा निषेध केला. या वेळी गेल्या वर्षभरात ६०० बालके कुपोषणाने मरण पावली आहेत. आपण काय केले, असा सवाल विचारताच पालकमंत्र्यांचा तोल गेला. सवरा म्हणाले, ‘मेली, मग काय झाले, असू देत ना, बघू आम्ही करू काय ते’ अशी मुक्ताफळे उधळली.गावात एकाही मंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाहीआता आम्ही सगळ्यांनी मिळून निर्धार केला की, आता आदिवासींची थट्टा पुरे. नुसते दौरे अन् भेटी नको. जोपर्यंत पालघर जिल्ह्यातील बालविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व रिक्त पदे भरत नाही, शून्य ते ६ वयोगटांतील प्रत्येक बालकाला पोषक आहार मिळत नाही, प्रत्येक गरोदर मातेला गरोदर काळापासून पोषक आणि चौरस आहार मिळत नाही, तोपर्यंत गावात एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही.- पांडू मालक,सरपंच, खोच ग्रामपंचायत