शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्र्यांचा पाणउतारा

By admin | Updated: September 17, 2016 03:39 IST

कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले

मोखाडा : कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘आले का फोटो काढायला!’ असा संतप्त सवाल सागरच्या आई व आजीने विचारून मंत्रीमहोदयांचा अक्षरश: पाणउतारा केला. दारातच असा पाणउतारा झाल्याने मंत्रीमहोदयांना आपल्या ताफ्यासह माघारी परतावे लागले.३० आॅगस्ट रोजी सागरचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. हा प्रकार आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटूनही कुपोषणबळी कुटुंबाकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. गुरुवारी सकाळी उशिरा पालकमंत्र्यांनी खोचगावातील पीडित कुटुंबीयांना भेट दिली. परंतु, या वेळी पालकमंत्र्यांना मृत सागरच्या आई व आजीने दारातच अडवले व जाब विचारला. यामुळे ताफ्यासह आलेल्या पालकमंत्र्यांना दारातूनच माघारी परतावे लागले. यानंतर, पालकमंत्र्यांनी खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणबळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नंतर, मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट न देता जव्हारकडे रवाना झाले. सागर वाघ हा श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या बालसंजीवन छावणीमध्ये उपचार घेत होता. सरकारने व्हीसीडीसी ही कुपोषण निर्मूलन व सकस आहार देणारी योजना सुरू केल्याची घोषणा केली आणि सागरचे पालक त्याला घरी घेऊन आले. मात्र, सरकारची योजना कागदावरच राहिली आणि त्यानंतर उपचाराअभावी सागरचा मृत्यू झाला. पालकमंत्र्यांच्या उशिरा हजेरीमुळे श्रमजीवीचे विजय जाधव, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडू मालक, संतोष धिंडा, गणेश माली यांनी काळ्या फिती लावून पालकमंत्र्यांचा निषेध केला. या वेळी गेल्या वर्षभरात ६०० बालके कुपोषणाने मरण पावली आहेत. आपण काय केले, असा सवाल विचारताच पालकमंत्र्यांचा तोल गेला. सवरा म्हणाले, ‘मेली, मग काय झाले, असू देत ना, बघू आम्ही करू काय ते’ अशी मुक्ताफळे उधळली.गावात एकाही मंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाहीआता आम्ही सगळ्यांनी मिळून निर्धार केला की, आता आदिवासींची थट्टा पुरे. नुसते दौरे अन् भेटी नको. जोपर्यंत पालघर जिल्ह्यातील बालविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व रिक्त पदे भरत नाही, शून्य ते ६ वयोगटांतील प्रत्येक बालकाला पोषक आहार मिळत नाही, प्रत्येक गरोदर मातेला गरोदर काळापासून पोषक आणि चौरस आहार मिळत नाही, तोपर्यंत गावात एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही.- पांडू मालक,सरपंच, खोच ग्रामपंचायत