शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत वुमेन समिटमध्ये दिग्गजांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2015 02:54 IST

कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहातर्फे कलर्स प्रस्तुत एइसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या

पुणे : कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहातर्फे कलर्स प्रस्तुत एइसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’ या चळवळीचे पाचवे पर्व रविवारी (दि. २२) पुण्यात हॉटेल हयात रिजेन्सी येथे रंगणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत विविध विषयांवर विचारमंथनही केले जाणार आहे. या वेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी, प्रसिध्द लेखक चेतन भगत, राजस्थानातील सोडा गावच्या भारतातील पहिल्या उच्चशिक्षित सरपंच छवी राजावत व महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे अशा दिग्गजांची मांदियाळी परिषदेचे भूषण ठरणार आहे. याशिवाय देशातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला संवाद साधणार आहे. (प्रतिनिधी)शबाना आझमी : पुण्यातील एफटीआयआयच्या माजी विद्यार्थी असलेल्या शबाना आझमी यांनी चित्रपटसृष्टीत ४० वर्षे पूर्ण केली आहेत. शाम बेनेगल यांच्या‘अंकुर’या चित्रपटातून १९७४ साली शबाना आझमी यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी १२० हून अधिक हिंदी, बंगाली तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या आहेत. पद्भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. लक्षवेधी भुमिकांसाठी आझमी यांना पाच वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चार फिल्मफेअर पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत. भारतीय समाज, रुढी-परंपरा यांचे चित्रण करणा-या अनेक चित्रपटांनी समाजमनावर परिणाम साधला. स्त्रियांचे हक्क, अधिकार तसेच सामाजिक चळवळीत त्या नेहमीच सक्रिय असतात. त्या युनायटेड नेशन्सच्या पाप्युलेशन फंडच्या (यूएनपीएफए) च्या गूडविल अ‍ॅम्बेसिडर आहेत. एचआयव्ही बाधित रुग्णांसाठीही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.छवी राजावत : राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील सोडा या गावच्या सरपंच छवी राजावत या भारतातील पहिल्या उच्चशिक्षित सरपंच ठरल्या आहेत. राजावत यांनी बंगळूर येथील रिशी व्हॅली स्कूल आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम येथे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुण्यात व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केले. मात्र, आजोबा रघुवीर सिंग यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांना गावाचा विकास करण्याची ओढ लागली होती. भारतातील खेड्याची ओळख आणि चित्र बदलण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या छवी यांनी वयाच्या २९ व्या वर्षी सोडा गावचे सरपंचपद स्वीकारले. भ्रष्टाचार, हिंसा, दुर्लक्ष, राजकारणातील वाईट प्रवृत्ती यांचा नाश करण्याच्या उद्देशाने त्यांनी विकासाचे अस्त्र हाती घेतले आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गावात नागरी सुविधा निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांनी कामाचा वसा हाती घेतला आहे. जयपूर येथील राजावत कुटुंबीयांचा असलेल्या हॉटेलचा कारभारही छवी पाहतात. घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणारी त्यांची स्वत:ची शाळा आहे. अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या गरिबीसंदर्भातील जागतिक परिषदेत छवी सहभागी झाल्या होत्या.चेतन भगत : फाइव्ह पॉइंट समवन, वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्स आॅफ माय लाइफ, टू स्टेट्स, रिव्हॉल्युशन २०२०, व्हॉट यंग इंडिया वाँटस, हाफ गर्लफ्रेंड अशा बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक चेतन भगत हे तरुणाईची प्रेरणा आणि आवाज ठरले आहेत. पाचपैकी चार पुस्तकांवर आधारित चित्रपटांनी यशाचे शिखर गाठले. थ्री इडीयटस या त्यांच्या कादंबरीवरील चित्रपटाने आशय आणि विषयातून भारतीय शिक्षणपध्दतीवर प्रकाशझोत टाकला. टाईम्स मासिकाने चेतन भगत यांचे नाव ‘जगातील सर्वात परिणामकारक १०० व्यक्तींमध्ये समाविष्ट केले आहे. तरुणाईच्या भावविश्वावरील त्यांचे लेखन प्रेरणादायी आहे.