शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गुरुदेव रानडे पुण्यतिथी सोहळा; निंबाळ येथे हत्तीवरून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:28 IST

भक्तीमय वातावरण ; १०८ सुवासिनींचा डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभाग

ठळक मुद्दे- गुरूदेव रानडे पुण्यतिथी सोहळ्याला ५० वर्षे पूर्ण- खास मुधोळ येथुन आणलेल्या हत्तीवर गुरूदेवांच्या प्रतिमेची मिरवणुक- वसंतराव पोद्दार यांनी पन्नास वर्षापुर्वी पालखी सोहळा सुरू केला होता

सोलापूर :  थोर साक्षात्कारी संत गुरुदेव रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पालखी सोहळ्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र निंबाळ येथे बुधवारी गुरुदेवांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. अतिशय थाटात निघालेल्या मिरवणुकीत आणि पालखी सोहळ्यात निंबाळवासी आणि निंबर्गी संप्रदायाचे साधक मोठ्या संख्येने सहभागी होते.

 पन्नास वर्षापूर्वी गुरुदेव आश्रम ते निंबाळ गाव असा पालखी सोहळा सुरू करण्यात आला होता. यंदा त्या सोहळ्याला ५० वर्षे पूर्ण झाली, याचे औचित्य साधून आज सकाळी सहा वाजता निंबाळ गावातून पालखी सोहळा सुरू झाला. खास मुधोळ येथून आणलेल्या हत्तीवर गुरुदेवांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली.  या मिरवणुकीत १०८ सुवासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. निंबाळ गावातून निघालेली मिरवणूक  मारुती मंदिर  रेल्वे स्टेशन मार्ग  सकाळी  साडेअकरा वाजता  आश्रमात पोहोचली. त्यानंतर भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

वसंतराव पोद्दार यांनी पन्नास वर्षांपूर्वी पालखी सोहळा सुरू केला होता. त्यावेळी पूज्य सीताबाई रानडे व भक्त मंडळींना सोबत घेऊन ही परंपरा कायम ठेवली.  हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी निंबाळ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुहास कुलकर्णी, सचिव नंदू देऊळकर, दीपक आपटे, गुरुदेव पोद्दार यांच्यासह सर्व ट्रस्टी,  साधकांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Solapurसोलापूर