शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

“जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच...”; सदावर्तेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:32 IST

Gunaratna Sadavarte News: सगेसोयरे कायदा करता येणार नाही, असे मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे.

Gunaratna Sadavarte News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेत आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे. 

कोणीतरी जरांगे उपोषणाचे ढोंग करत आहे. ट्रॅक्टर असूनही ट्रॅक्टर नसल्याचे सांगितले जात आहे. घर असूनही ते नसल्याचे सांगितले जात आहे. अंगठे बहाद्दर माणसांकडून सर्वेक्षण केले. मनोज जरांगे यांचा मोर्चाचा स्टंट होता. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केले. मनोज जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे. कारण जरांगे म्हणजे कायदा नाही, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा हा दिवस असेल. मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जात आहे. कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलोत का? अशी विचारणा सदावर्ते यांनी केली. 

सगेसोयरे कायदा करता येणार नाही

५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देता, इतरांना फक्त ३७ टक्के जागा उरणार. ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही. सगेसोयरे कायदा करता येणार नाही. सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार राहावे. विशेष अधिवेशनात सरकारने कायदा आणला तर काही तासांत न्यायालयात कायद्याला चॅलेंज करणार, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. 

दरम्यान, राज्य सरकारला विनंती आहे की, विशेष अधिवेशनात पहिल्या सत्रात सगेसोयरे विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी. मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना लाभ मिळावा म्हणून या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय घ्यावा ही विनंती. सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांनी हा विषय लावून धरावा. अंमलबजावणी झाल्यावर तो वेगळ्या प्रवर्गाच्या विषय घ्यावा. सरकार काळजीवाहू आहे. जनतेचे मायबाप आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेMaratha Reservationमराठा आरक्षण