शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

गुजरातचे दूध रेल्वेने आले मुंबईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:19 IST

‘गुजरातमधून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ दिला जाणार नाही,’ हा गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा दावा फोल ठरला

पालघर : ‘गुजरातमधून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ दिला जाणार नाही,’ हा गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा दावा फोल ठरला असून, सोमवारी सौराष्ट एक्स्प्रेसला जोडलेल्या दोन टँकरमधून ८० हजार लीटर दूध मुंबईकडे रवाना झाले. याच वेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे तारापूरमध्ये आंदोलन करीत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्थानिक दुधाचाच वापर होत असल्याने आंदोलनाचा परिणाम जाणवला नाही.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळावी, या स्वाभिमानी संघटनेच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने सोमवार (१६ जुलै)पासून राज्यभर आंदोलन सुरू केले. हे आंदोलन थोपवण्यासाठी शासनाने कर्नाटक आणि गुजरातमधून दुधाची आयात सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेतृत्व हार्दिक पटेल यांनी खासदार राजू शेट्टी यांना फोन करून, त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवित आमचे कार्यकर्ते गुजरातमधून मुंबईला जाणारे दूध रोखून धरतील, असे आश्वासित केले होते. दररोज पोरबंदर येथून मुंबईकडे जाणाºया सौराष्ट्र एक्स्प्रेसला टँकर जोडून गुजरातमधून दूध मुंबईला पाठविले जाते. सोमवारी ही गाडी बोईसर येथे आल्यावर बोईसर, पालघर, सफाळे आदी रेल्वे स्थानकांवर आंदोलक आंदोलन करतील, या शक्यतेमुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे ४ वाजून ५५ मिनिटांनी एक्स्प्रेस पालघर येथे आल्यानंतर कुठलेही आंदोलन झाले नाही. या गाडीला जोडलेले ४० हजार लीटर्स क्षमतेचे २ टँकर मुंबईकडे रवाना झाले. तर तारापूरजवळील अमूल डेअरीजवळ राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.>‘स्वाभिमानी’चा प्रयत्न पाडला हाणूनकसारा : मुंबईला सर्वाधिक दूधपुरवठा संगमनेर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून होत असल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घोटी टोल नाक्यावर आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी घोटी टोलनाक्यावरील आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान, आंदोलकांनी कसारा घाटात दूध टँकर अडवून टायरमधील हवा काढण्याचा प्रयत्न करणाºया पाच आंदोलकांना कसारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.>गळक्या टाक्यांमुळे दूध वायासौराष्ट्र मेल एक्स्प्रेस गाडीला जोडण्यात आलेले दूध टँकर हे गळके असल्याने, हजारो लीटर्स दूध वाया जात असल्याचे दिसून आले. तर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमधून एकही थेंब मुंबईत नेण्यात येणार नाही, या दाव्यानंतर मुंबईकडे आलेली सौराष्ट्र एक्स्प्रेस गाडीचे इंजिनच अमूल दूध कंपनीच्या पोस्टरने गुजरात सरकारने मुद्दाम सजवून पाठविले होते की काय? अशी चर्चा रेल्वे स्थानकात उपस्थित प्रवाशांमधून होत होती.>मराठवाड्यात संमिश्र प्रतिसादआंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यात संमिश्र प्रतसाद मिळाला. लातूर, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाIndian Railwayभारतीय रेल्वेhardik patelहार्दिक पटेलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGujaratगुजरात