शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गुजरातचे दूध रेल्वेने आले मुंबईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:19 IST

‘गुजरातमधून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ दिला जाणार नाही,’ हा गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा दावा फोल ठरला

पालघर : ‘गुजरातमधून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ दिला जाणार नाही,’ हा गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा दावा फोल ठरला असून, सोमवारी सौराष्ट एक्स्प्रेसला जोडलेल्या दोन टँकरमधून ८० हजार लीटर दूध मुंबईकडे रवाना झाले. याच वेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे तारापूरमध्ये आंदोलन करीत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्थानिक दुधाचाच वापर होत असल्याने आंदोलनाचा परिणाम जाणवला नाही.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळावी, या स्वाभिमानी संघटनेच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने सोमवार (१६ जुलै)पासून राज्यभर आंदोलन सुरू केले. हे आंदोलन थोपवण्यासाठी शासनाने कर्नाटक आणि गुजरातमधून दुधाची आयात सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेतृत्व हार्दिक पटेल यांनी खासदार राजू शेट्टी यांना फोन करून, त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवित आमचे कार्यकर्ते गुजरातमधून मुंबईला जाणारे दूध रोखून धरतील, असे आश्वासित केले होते. दररोज पोरबंदर येथून मुंबईकडे जाणाºया सौराष्ट्र एक्स्प्रेसला टँकर जोडून गुजरातमधून दूध मुंबईला पाठविले जाते. सोमवारी ही गाडी बोईसर येथे आल्यावर बोईसर, पालघर, सफाळे आदी रेल्वे स्थानकांवर आंदोलक आंदोलन करतील, या शक्यतेमुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे ४ वाजून ५५ मिनिटांनी एक्स्प्रेस पालघर येथे आल्यानंतर कुठलेही आंदोलन झाले नाही. या गाडीला जोडलेले ४० हजार लीटर्स क्षमतेचे २ टँकर मुंबईकडे रवाना झाले. तर तारापूरजवळील अमूल डेअरीजवळ राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.>‘स्वाभिमानी’चा प्रयत्न पाडला हाणूनकसारा : मुंबईला सर्वाधिक दूधपुरवठा संगमनेर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून होत असल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घोटी टोल नाक्यावर आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी घोटी टोलनाक्यावरील आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान, आंदोलकांनी कसारा घाटात दूध टँकर अडवून टायरमधील हवा काढण्याचा प्रयत्न करणाºया पाच आंदोलकांना कसारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.>गळक्या टाक्यांमुळे दूध वायासौराष्ट्र मेल एक्स्प्रेस गाडीला जोडण्यात आलेले दूध टँकर हे गळके असल्याने, हजारो लीटर्स दूध वाया जात असल्याचे दिसून आले. तर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमधून एकही थेंब मुंबईत नेण्यात येणार नाही, या दाव्यानंतर मुंबईकडे आलेली सौराष्ट्र एक्स्प्रेस गाडीचे इंजिनच अमूल दूध कंपनीच्या पोस्टरने गुजरात सरकारने मुद्दाम सजवून पाठविले होते की काय? अशी चर्चा रेल्वे स्थानकात उपस्थित प्रवाशांमधून होत होती.>मराठवाड्यात संमिश्र प्रतिसादआंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यात संमिश्र प्रतसाद मिळाला. लातूर, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाIndian Railwayभारतीय रेल्वेhardik patelहार्दिक पटेलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGujaratगुजरात