शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चौपाट्यांवर सुविधा उपलब्ध करण्याची हमी द्या- हायकोर्ट

By admin | Updated: August 24, 2016 05:46 IST

सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात राज्य सरकारने २००६ मध्ये अधिसूचना काढूनही दहा वर्षांनंतरही या अधिसूचनेवर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही

मुंबई : राज्यातील धोकादायक चौपाट्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात राज्य सरकारने २००६ मध्ये अधिसूचना काढूनही दहा वर्षांनंतरही या अधिसूचनेवर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी दर्शवत, राज्य सरकारला तीन महिन्यांत सर्व चौपाट्यांवर सुविधा उपलब्ध करा, अन्यथा अवमान नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला.चौपाट्यांच्या सुरक्षेसंदर्भात जनहित मंच या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी चौपाट्यांवर अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या सुविधा पुरविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती खंडपीठाला केली. त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही (सरकार) २००६ पासून २०१६ पर्यंत अधिसूचनेवर अंलबजावणी न करता केवळ मुदतवाढ मागत आहात. आता शेवटची मुदतवाढ देण्यापूर्वी तुम्ही आम्हाला हमी द्या की, या तीन महिन्यांत राज्यातील सर्व चौपाट्यांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याल. या हमीवरच आम्ही तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ अन्यथा अवमान नोटीस बजावू,’ असे खंडपीठाने संतापत म्हटले. चौपाट्यांच्या सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाने २००६ मध्ये राज्य सरकारला काही निर्देश दिले. त्यानुसार, राज्य सरकारने अधिसूचना काढली. चौपाट्यांवर गस्त घालणे, जीवनरक्षक नेमणे, भरती व ओहोटीसंबंधीची माहिती फलकावर लिहिणे, वॉच टॉवर व अन्य साधने उपलब्ध करून देण्यासंबंधीचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर ठेवली आहे. (प्रतिनिधी)