शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

खुल्या प्रवर्गासाठी बढत्या पुन्हा सुरू होणार

By यदू जोशी | Updated: December 6, 2017 05:44 IST

मागासवर्गीयांसाठी बढत्यांमधील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचा फटका खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बसल्याने निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत आता

मुंबई : मागासवर्गीयांसाठी बढत्यांमधील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचा फटका खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बसल्याने निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत आता खुल्या प्रवर्गातील पदोन्नती सुरू करण्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. त्या बाबत विभागाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.सर्वच प्रवर्गांच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या बढत्या ३ नोव्हेंबरच्या आदेशाने शासनाने रोखून धरल्या आहेत. एससी, एसटी, एसबीसी आणि व्हीजेएनटी या मागास प्रवर्गांना बढत्यांमधील आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागासवर्गीयांबरोबरच त्याचा फटका खुल्या प्रवर्गालादेखील बसला. काही अधिकाºयांना निवृत्तीच्या तोंडावर बढतीची आशा होती पण सरकारच्या निर्णयामुळे ते बढतीपासून वंचित राहिले.राज्य सरकारने २००४ मध्ये मागासवर्गीयांना बढत्यांमध्ये दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने या वर्षी ४ आॅगस्टला रद्द ठरविले होते. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही. आता येत्या ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे.३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील सुमारे एक हजार बढत्या रखडल्याअसून त्यातील ७०० या खुल्या प्रवर्गातील असून दरदिवशी हा आकडा वाढत आहे.सध्या १०० टक्के बढत्या बंद आहेत. त्याऐवजी खुल्या प्रवर्गातील बढत्या (६७ टक्के) सुरू कराव्यात आणि मागास प्रवर्गातील बढत्या (३३ टक्के) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर द्याव्यात, असेसामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.सामान्य प्रशासन विभागाने विधि व न्याय विभागाला सल्ला मागितल्यानंतर आता या विभागाने राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सल्ला मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले.