शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भूगर्भातील पाण्याचे नियोजनच आता तारणार !

By admin | Updated: April 24, 2015 01:40 IST

पावसाचा अंदाज बघूून पीक पद्धतीत बदलाची गरज

अकोला : गतवर्षी झालेला कमी पाऊस आणि यावर्षी हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शेतकर्‍यांनासुद्धा पावसाचा अंदाज बघून पीकपद्धतीत बदल करावे लागतील.गतवर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. उदाहरणार्थ अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांतील पावसाची सरासरी आकडेवारी अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिलत केवळ ६७४ मि.मी., तर २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला. २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंत या पावसाची नोंद ६८0.७0 मि.मी. झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त असे पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येते. त्यामुळे गतवर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् व जलसंधारण विभागाने काढला आहे.यासंदर्भात राज्याचे कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय हवामानशास्त्राला इतिहास असल्याने या शास्त्राच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी विदर्भ, मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी कोणती पिके घ्यावी, याचे नियोजन करण्याची गरज आहे. असेच हवामान राहिल्यास शेतकर्‍यांना कमी कालावधीची पिके घ्यावी लागतील. तूर, सोयाबीन, घेवडा, मका आदी हुकमी पिकांचा विचार शेतकर्‍यांना करावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान येथील कृषिविद्यापीठाच्या मृद् व जल संधारण विभागाचे प्रमुख डॉ सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अलिकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने भूगर्भातील पाण्याचे जपून नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. *पीकपद्धती बदलावी लागणार?पूर्व व पश्‍चिम विदर्भातील पीकरचना वेगवेगळी आहे. पश्‍चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिके घेतली जातात. पूर्व विदर्भात धान या मुख्य पिकासह इतर कडधान्य-तृणधान्य व तेलबिया पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचा जो अंदाज वर्तविण्यात आला आहे, तो बघितल्यास पीकपद्धती बदलावी लागण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना यासाठी कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी लागणार आहे; पण त्यासाठी पुन्हा हवामानशास्त्र विभाग दुसरे भाकीत वर्तविणार आहे, तेही बघणे आवश्यक राहणार आहे.