शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील पाण्याचे नियोजनच आता तारणार !

By admin | Updated: April 24, 2015 01:40 IST

पावसाचा अंदाज बघूून पीक पद्धतीत बदलाची गरज

अकोला : गतवर्षी झालेला कमी पाऊस आणि यावर्षी हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शेतकर्‍यांनासुद्धा पावसाचा अंदाज बघून पीकपद्धतीत बदल करावे लागतील.गतवर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. उदाहरणार्थ अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांतील पावसाची सरासरी आकडेवारी अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिलत केवळ ६७४ मि.मी., तर २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला. २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंत या पावसाची नोंद ६८0.७0 मि.मी. झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त असे पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येते. त्यामुळे गतवर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् व जलसंधारण विभागाने काढला आहे.यासंदर्भात राज्याचे कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय हवामानशास्त्राला इतिहास असल्याने या शास्त्राच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी विदर्भ, मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी कोणती पिके घ्यावी, याचे नियोजन करण्याची गरज आहे. असेच हवामान राहिल्यास शेतकर्‍यांना कमी कालावधीची पिके घ्यावी लागतील. तूर, सोयाबीन, घेवडा, मका आदी हुकमी पिकांचा विचार शेतकर्‍यांना करावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान येथील कृषिविद्यापीठाच्या मृद् व जल संधारण विभागाचे प्रमुख डॉ सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अलिकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने भूगर्भातील पाण्याचे जपून नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. *पीकपद्धती बदलावी लागणार?पूर्व व पश्‍चिम विदर्भातील पीकरचना वेगवेगळी आहे. पश्‍चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिके घेतली जातात. पूर्व विदर्भात धान या मुख्य पिकासह इतर कडधान्य-तृणधान्य व तेलबिया पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचा जो अंदाज वर्तविण्यात आला आहे, तो बघितल्यास पीकपद्धती बदलावी लागण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना यासाठी कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी लागणार आहे; पण त्यासाठी पुन्हा हवामानशास्त्र विभाग दुसरे भाकीत वर्तविणार आहे, तेही बघणे आवश्यक राहणार आहे.