शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील पाण्याचे नियोजनच आता तारणार !

By admin | Updated: April 24, 2015 01:40 IST

पावसाचा अंदाज बघूून पीक पद्धतीत बदलाची गरज

अकोला : गतवर्षी झालेला कमी पाऊस आणि यावर्षी हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शेतकर्‍यांनासुद्धा पावसाचा अंदाज बघून पीकपद्धतीत बदल करावे लागतील.गतवर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. उदाहरणार्थ अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांतील पावसाची सरासरी आकडेवारी अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिलत केवळ ६७४ मि.मी., तर २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला. २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंत या पावसाची नोंद ६८0.७0 मि.मी. झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त असे पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येते. त्यामुळे गतवर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् व जलसंधारण विभागाने काढला आहे.यासंदर्भात राज्याचे कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय हवामानशास्त्राला इतिहास असल्याने या शास्त्राच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी विदर्भ, मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी कोणती पिके घ्यावी, याचे नियोजन करण्याची गरज आहे. असेच हवामान राहिल्यास शेतकर्‍यांना कमी कालावधीची पिके घ्यावी लागतील. तूर, सोयाबीन, घेवडा, मका आदी हुकमी पिकांचा विचार शेतकर्‍यांना करावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान येथील कृषिविद्यापीठाच्या मृद् व जल संधारण विभागाचे प्रमुख डॉ सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अलिकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने भूगर्भातील पाण्याचे जपून नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. *पीकपद्धती बदलावी लागणार?पूर्व व पश्‍चिम विदर्भातील पीकरचना वेगवेगळी आहे. पश्‍चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिके घेतली जातात. पूर्व विदर्भात धान या मुख्य पिकासह इतर कडधान्य-तृणधान्य व तेलबिया पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचा जो अंदाज वर्तविण्यात आला आहे, तो बघितल्यास पीकपद्धती बदलावी लागण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना यासाठी कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी लागणार आहे; पण त्यासाठी पुन्हा हवामानशास्त्र विभाग दुसरे भाकीत वर्तविणार आहे, तेही बघणे आवश्यक राहणार आहे.