शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

भूगर्भातील पाण्याचे नियोजनच आता तारणार !

By admin | Updated: April 24, 2015 01:40 IST

पावसाचा अंदाज बघूून पीक पद्धतीत बदलाची गरज

अकोला : गतवर्षी झालेला कमी पाऊस आणि यावर्षी हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शेतकर्‍यांनासुद्धा पावसाचा अंदाज बघून पीकपद्धतीत बदल करावे लागतील.गतवर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. उदाहरणार्थ अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांतील पावसाची सरासरी आकडेवारी अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिलत केवळ ६७४ मि.मी., तर २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला. २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंत या पावसाची नोंद ६८0.७0 मि.मी. झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त असे पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येते. त्यामुळे गतवर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् व जलसंधारण विभागाने काढला आहे.यासंदर्भात राज्याचे कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय हवामानशास्त्राला इतिहास असल्याने या शास्त्राच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी विदर्भ, मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी कोणती पिके घ्यावी, याचे नियोजन करण्याची गरज आहे. असेच हवामान राहिल्यास शेतकर्‍यांना कमी कालावधीची पिके घ्यावी लागतील. तूर, सोयाबीन, घेवडा, मका आदी हुकमी पिकांचा विचार शेतकर्‍यांना करावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान येथील कृषिविद्यापीठाच्या मृद् व जल संधारण विभागाचे प्रमुख डॉ सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अलिकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने भूगर्भातील पाण्याचे जपून नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. *पीकपद्धती बदलावी लागणार?पूर्व व पश्‍चिम विदर्भातील पीकरचना वेगवेगळी आहे. पश्‍चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिके घेतली जातात. पूर्व विदर्भात धान या मुख्य पिकासह इतर कडधान्य-तृणधान्य व तेलबिया पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचा जो अंदाज वर्तविण्यात आला आहे, तो बघितल्यास पीकपद्धती बदलावी लागण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना यासाठी कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी लागणार आहे; पण त्यासाठी पुन्हा हवामानशास्त्र विभाग दुसरे भाकीत वर्तविणार आहे, तेही बघणे आवश्यक राहणार आहे.