शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

माणुसकीची भिंत ठरतेय गोरगरिबांसाठी आधारवड

By admin | Updated: October 21, 2016 08:54 IST

नागपूरमधील राजेश दुरुगकर नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ‘माणुसकीची भिंत’ या गोरगरिबांसाठी खरोखरच एक आधारवड ठरत आहे.

थंडीत कुडकुडणाऱ्यांसाठी कपड्यांची मदत

दयानंद पाईकराव , ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २१ -  समाजात एक वर्ग असा आहे की त्याच्याजवळ अमाप संपत्ती, ऐषोआरामाच्या वस्तू मुबलक आहेत. परंतु नाण्याची दुसरी बाजू म्हणजे दोन वेळचे जेवण अन् अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नसलेले गरीब लोक. समाजातील हे भीषण वास्तव पाहून राजेश दुरुगकर नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ‘माणुसकीची भिंत’ या गोरगरिबांसाठी खरोखरच एक आधारवड ठरत आहे.राजेश दुरुगकर हे भारत पेट्रोलियममधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले व्यक्ती. त्यांनीच समाजातील भीषण दारिद्र्य पाहून माणुसकीची भिंत हा उपक्रम अ‍ॅक्शन ग्रुपच्या माध्यमातून शंकरनगर चौकात सुरू केला. शंकरनगर चौकातील भिंतीवर त्यांनी ४० खिळे ठोकले आहेत. यात वापरलेले कपडे दात्यांनी आणून या खिळ्यावर अडकवून निघून जावे अन् ज्यांना खरोखरच घालण्यासाठी कपडे नाहीत, अशा गरीब, गरजूंनी हे कपडे काढून ते वापरावेत अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ५०० कपडे या माणुसकीच्या भिंतीवर आणून लावले. यात जुने चप्पल, जोडे, चादर, पुस्तके, अंगात घालावयाचे कपडे यांचा समावेश आहे. थंडीच्या दिवसात अनेकांना या उपक्रमामुळे अंगावर घेण्यासाठी चादर आणि कपड्यांची मोलाची मदत झाली आहे. नागपुरातील सर्व भागातील गरिबांना कपडे मिळावेत यासाठी हा उपक्रम लवकरच बजाजनगर, सदर, सीताबर्डी, लॉ कॉलेज चौक येथे सुरू करणार असल्याचे राजेश दुरुगकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माणुसकीची भिंत या उपक्रमाव्यतिरिक्त गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, गरजूंना औषधी वितरण, आजारी असलेल्या मोकाट जनावरांची काळजी घेणे हे कार्यही ते मागील सात वर्षांपासून करीत आहेत. नागपूरव्यतिरिक्त मुंबईत नेरुळ आणि वाशीलाही त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाला समाजातील दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अमेरिकेत गेल्यानंतर सुचली कल्पनाराजेश दुरुगकर हे अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांना एका भिंतीवर कपडे अडकविलेले आढळले. उत्सुकतेपोटी त्यांनी हे कपडे कशासाठी लटकविले आहेत याची विचारणा केली. त्यावर त्यांना हे कपडे गोरगरीब नागरिकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. भारतातील दारिद्र्य आणि गरजूंसाठी हा उपक्रम राबविण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि लगेचच त्यांनी आपल्या मनातील विचार कृतीत उतरवून माणुसकीची भिंती उभी केली.