शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राज्यात गावठीचा महापूर!

By admin | Updated: July 16, 2015 05:43 IST

पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्र कोरडाठाक पडला असला तरी, राज्यात गावठी दारूचा महापूर आलेला आहे. गावोगावी हातभट्ट्या लागल्या असून, पोलीस आणि स्थानिक

लोकमत स्टिंग : महानगरांमधून वाहतेय हातभट्टीची गटारगंगा
 
मुंबई - पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्र कोरडाठाक पडला असला तरी, राज्यात गावठी दारूचा महापूर आलेला आहे. गावोगावी हातभट्ट्या लागल्या असून, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला ‘धाब्या’वर बसवून खुलेआम गावठी दारू विकली जात आहे. मुंबई, पुण्यासह मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातून ही गटारगंगा वाहत आहे. मुंबईतील मालवणी दारूकांडानंतर राज्यातील ‘गावठी’चे वास्तव ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी उजेडात आणले आहे. 
मुंबईच्या मालवणी भागातील गुत्त्यांवर मिथेनॉलमिश्रित विषारी दारू पिऊन तब्बल १०४ जण दगावले. या दारूकांडानंतर शासनाने कारवाई करीत उत्पादन शुल्क विभागाचे ४ अधिकारी तसेच मालवणीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ कर्चमारी निलंबित केले. शिवाय,आरोपींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखालील गृहविभागाने राज्यातून गावठीचे उच्चाटन करा, असे सक्त आदेश पोलिसांना दिले. मात्र गृहविभागाचे हे आदेश नागपूर व पुण्यात धाब्यावर बसवून दारूविक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंगमधून उघडकीस आले. 
नागपूर शहरात खुलेआम मोहाची दारू गाळली जात आहे. शहराच्या विविध भागांमध्ये गावठीचे रॅकेट कार्यरत आहे. लोकमत प्रतिनिधीने नागपूर शहरातील नंदनवन परिसरातील दोन ठिकाणांहून गावठी दारू मिळवली. इमामवाड्यातील जाटतरोडी भागातील पानटपऱ्यांवर मोहाच्या गावठी दारूबददल माहिती मिळवली. इधर अच्छी, तेज दारू कहा मिलती है, असे विचारता टपरीचालकाने तीन-चार ठिकाणांची माहिती दिली. ‘दारू चाहीये’, अशी मागणी करताच दारू विक्रेत्याने क्षणात बाटली समोर केली.
 
फडणवीसांचे नागपूर शहर दारूचे नंदनवन
नागपूर शहरात गिट्टीखदान (भिवसनखोरी), एमआयडीसी (ईसासनी, शिवनगाव), अंबाझरी (पांढराबोडी), राजनगर (सदर), जरीपटका (मार्टिननगर, टेका, नारा), पाचपावली (लष्करीबाग, तांडापेठ, लालगंज, मोतीबाग), गणेशपेठ (बाजोरिया, लोधीपुरा), इमामवाडा (रामबाग, जाटतरोडी, इंदिरानगर), धंतोली (तकिया, चुनाभट्टी), अजनी (रामेश्वरी, जोगीनगर, टोली), नंदनवन झोपडपट्टी, हिवरीनगर, भांडेवाडी, सक्करदरा, सोनेगाव आदी भागांत मिळते गावठी दारू.
 
पुणे इथेही नाही उणे!
१) पुण्याचेही चित्र फारसे वेगळे नाही. येथे अनेक ठिकाणी चोरीछुपे गावठीच्या थैल्या तळीरामांच्या हातावर टेकवल्या जातात. गोखलेनगरमधील जनवाडी परिसरात राजरोस गावठी विकत मिळते. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या जनवाडी येथील गल्ली बोळात बेकायदा दारु धंदे बोकाळले आहेत. काही घरात महिला दारु विकत आहेत. ताराबाई उद्यानाजवळच्या गुत्त्यावर पोचलेल्या प्रतिनिधीने रिक्षा एका झाडाच्या पारावजळ उभी केली. 
२) पारावार बसलेल्या एकाने ताबडतोब इशा-यानेच काय हवे विचारले. त्याला माल पाहिजे असे सांगताच ‘किती’ असा त्याचा प्रश्न आला. एक फुगा त्याच्याकडे मागितला. (एक फुगा म्हणजे साधारणपणे अर्धा लिटर दारु) त्याने शेजारच्या किराना मालाच्या दुकाणामधून प्लास्टीक पिशवी विकत घ्यायला सांगितली. त्यानंतर अरुंद बोळात पाण्याच्या बादल्यांसोबत ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या कॅनमध्ये भरुन ठेवलेली हातभट्टीची दारु दिली. 
३) एका फुग्याचे गुत्त्यावाल्याने ३५ रुपये सांगितले होते. त्याला दोन फुग्यांचे १०० रुपये देऊ केले परंतु त्याने जास्तीचे पैसे घेण्यास नकार दिला. पोलिसांच्या समोरच हातभट्टीचा धंदा तेजीत चाललेला होता. या सर्व प्रकारचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. पुण्यातील धनकवडी , हडपसर, कोंढवा वानवडी, वारजे, धायरी, नर्हे, कोथरूड, बाणेर, बालेवाड़ी, पिंपरी चिंचवड, दिघी, भोसरी, एमआयडीसी, विश्रांतवाड़ी, मुंढवा, येरवडा, चंदननगर या भागांमध्ये हातभट्टीचे धंदे आहेत.
 
मुंबईत तूर्तास ‘गावठी’ थंड
मालवणी दारूकांडानंतर आयुक्त राकेश मारिया यांनी गावठीचा गुत्ता आढळल्यास विभागाच्या उपायुक्तांवर कठोर कारवाई केली जाईल, असा दम भरल्याने गावठी दारूला तूर्तास तरी आळा बसला आहे. 
 
औरंगाबादेतील गुत्त्यांवर धाडी
औरंगाबादेतील गावठी दारूच्या ५३ अड्ड्यावंर धाडी टाकून ते उद्धवस्त करण्यात आले. जिल्ह्णातील डोंगराळ भागात विशेषत: सिल्लोड, सोयगाव, कन्नड या तालुक्यात शंभरहून अधिक भटटयांवर गाळलेली दारू औरंगाबाद, जालना जिल्ह्णातील विविध गावांतील विक्रेत्यांपर्यंत पोहचविले जाते.
 
रॅकेटची दाणादाण
गेल्यावर्षीपासूनच हातभट्टी चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली होती. अवैध मद्यनिर्मिती, मद्यसाठा, मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी २००८ गुन्हे दाखल करून त्यात ११४० आरोपींना अटक करण्यात आली होती़ या कारवाई अंतर्गत हातभट्टीची २२ हजार २५४ लिटर दारू जप्त करून दोन लाख ३५ हजार ७६३ लिटर रसायनही नष्ट करण्यात आले़ 
 
१० लाख लिटर रसायन नष्ट : उत्पादन शुल्क विभागाने अशा रसायनापासून तयार झालेली गावठी दारू हस्तगत केलीच. पण राज्यातून सुमारे ९ लाख ७४ हजार लिटर रसायन नष्ट केले.
 
१ लाख लीटर गावठी हस्तगत
उत्पादन शुल्क विभागाने १८ जून ते २ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यातून १ लाख ६७ हजार लीटर गावठी दारू हस्तगत केली. त्यातील सुमारे ८० गावठी दारू गाळणाऱ्या भट्ट्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सापडल्या. ठाणे विभागात (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड) सर्वाधिक तर औरंगाबाद विभागात सर्वांत कमी गावठी दारू हस्तगत करण्यात आली. ठाणे विभागात खाड्या आहेत. तिवरांची जंगले आहेत. त्यामुळे येथे मुबलक पाणी, भट्ट्या लावण्यासाठी सुरक्षित जागा असल्याने अधिक दारू आढळते.