शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पेन्शन योजनेतही देणार ग्रॅच्युईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 07:21 IST

सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी केलेल्या संपानंतर आता राज्य सरकारने निवृत्तिवेतनासंदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतले आहेत. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील आता ग्रॅच्युईटीची (सेवा उपदान) रक्कम दिली जाणार आहे. वित्त विभागाने यासंबंधीचा आदेश काढला आहे.

जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यासंदर्भात राज्य कर्मचाऱ्यांनी (‘गट क’ व ‘गट ड’) मध्यंतरी सात दिवसांचा संप केला होता. जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात तीन सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केली आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला नसला तरी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत.२००५ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ग्रॅच्युईटी दिली जात नव्हती. आता कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना   तसेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला स्वत:ला  ग्रॅच्युईटी मिळणार आहे.

कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले तर त्याच्या कुटुंबीयांना आधी काहीही रक्कम दिली जात नव्हती. कर्मचारी संघटनांच्या दबावानंतर १० लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, ही रक्कम अपुरी असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते.  केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू करताना कर्मचाऱ्याचे सेवेदरम्यान निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेनुसार कुटुंब निवृत्तिवेतन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तोच निर्णय राज्य सरकारनेही घ्यावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी होती. आता ती मान्य करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तिवेतन मिळाले असते त्याच्या ३० टक्के रक्कम आता सेवेत असताना त्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिले जाणार आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनMaharashtraमहाराष्ट्र