शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नवीन पेन्शन योजनेतही देणार ग्रॅच्युईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 07:21 IST

सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी केलेल्या संपानंतर आता राज्य सरकारने निवृत्तिवेतनासंदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतले आहेत. २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनादेखील आता ग्रॅच्युईटीची (सेवा उपदान) रक्कम दिली जाणार आहे. वित्त विभागाने यासंबंधीचा आदेश काढला आहे.

जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यासंदर्भात राज्य कर्मचाऱ्यांनी (‘गट क’ व ‘गट ड’) मध्यंतरी सात दिवसांचा संप केला होता. जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात तीन सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केली आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला नसला तरी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत.२००५ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ग्रॅच्युईटी दिली जात नव्हती. आता कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना   तसेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला स्वत:ला  ग्रॅच्युईटी मिळणार आहे.

कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले तर त्याच्या कुटुंबीयांना आधी काहीही रक्कम दिली जात नव्हती. कर्मचारी संघटनांच्या दबावानंतर १० लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, ही रक्कम अपुरी असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते.  केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू करताना कर्मचाऱ्याचे सेवेदरम्यान निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेनुसार कुटुंब निवृत्तिवेतन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तोच निर्णय राज्य सरकारनेही घ्यावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी होती. आता ती मान्य करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तिवेतन मिळाले असते त्याच्या ३० टक्के रक्कम आता सेवेत असताना त्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिले जाणार आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनMaharashtraमहाराष्ट्र