शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

सभापतींवरील अविश्वास मंजूर

By admin | Updated: March 17, 2015 01:49 IST

विधान परिषदेच्या इतिहासात आज सोमवारी एक अभूतपूर्व अशी घटना घडली. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव भाजपाच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाला.

विधान परिषदेत अभूतपूर्व घटना : राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाची अभद्र युती, शिवसेना तटस्थमुंबई : विधान परिषदेच्या इतिहासात आज सोमवारी एक अभूतपूर्व अशी घटना घडली. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव भाजपाच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाला. अविश्वास ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शेकाप व अन्य ४ अशा ४५ सदस्यांनी मते टाकली; तर ठरावाच्या विरोधात काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व लोकभारती अशा २२ सदस्यांनी मतदान केले. शिवसेनेने अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडली खरी, परंतु प्रत्यक्ष मतदानावेळी ते तटस्थ राहिले. सभापती देशमुख यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांची निवड घोषित न करून पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित व अन्य २४ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर तब्बल चार तास चर्चा झाली. चर्चेअंती जेव्हा ठराव मताला टाकला तेव्हा त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या २८, भाजपाच्या १२, शेकापचे १ तसेच नागो गाणार, रामनाथ मोते, दत्तात्रय सावंत, अपूर्व हिरे या शिक्षक आमदारांनी पाठिंबा दिला. ठरावाच्या विरोधात काँग्रेसचे २०, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे व लोकभारतीचे कपिल पाटील अशा २२ सदस्यांनी मतदान केले. विजय सावंत हे सदस्य अनुपस्थित होते, तर शिवसेनेच्या ७ सदस्यांसह अपक्ष सदस्य श्रीकांत देशपांडे हे तटस्थ राहिले. उपसभापती वसंत डावखरे हे पीठासीन असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. अविश्वास ठरावावरील चर्चेच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर टीकास्त्र सोडले, एकमेकांना चिमटे घेतले, वेळप्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढले. यामुळे काहीवेळा सभागृहात हास्याची लकेर उठली, तर काही क्षण तणाव निर्माण झाला. (विशेष प्रतिनिधी)रामाने बाण मारण्याची गरज नव्हती!आपल्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर काही बोलायचे नाही. आकड्यांची सोंगटी फेकून सारीपटावर अप्रतिष्ठेचे गणित जुळवण्याच्या या प्रकाराचा आपल्याला खेद वाटतो. खरेतर, वाली व सुग्रीव यांच्या भांडणात रामाने बाण मारण्याची गरज नव्हती! - शिवाजीराव देशमुखभाजपाचे ‘मूंह में राम, बगल में छुरी’ च्भविष्यात भाजपा व राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे स्पष्ट संकेत या ठरावावरील उभय पक्षांच्या भूमिकेवरून मिळाले आहेत, असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला. च्‘मूंह मे राम, बगल में छुरी’ असे भाजपाचे धोरण असून त्यांचे राष्ट्रवादीबरोबर साटेलोटे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व वादग्रस्त नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. च्आज आम्ही जात्यात आहोत, पण उद्या काँग्रेसच्या सुपातील व टोपलीतील नेत्यांची चौकशी होणार आहे, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला. भाजपासोबत जायचे असते तर १९९९ सालीच सरकारमध्ये गेलो असतो, असेही ते म्हणाले.१९७९ची आठवणशरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार असताना ५ एप्रिल १९७९ रोजी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष गजाननराव गरुड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. काँग्रेसने बहिष्कार टाकल्याने तो बहुमताने मंजूर झाला होता.उपसभापतीपद भाजपालाविधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याच्या मोबदल्यात भाजपाला उपसभापतीपद दिले जाऊ शकते. या पदासाठी भाजपाकडून ज्येष्ठ सदस्य पांडुरंग फुंडकर यांचे नाव चर्चेत आहे.