शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:09 IST

केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती. सगळ्याच मराठ्यांना आरक्षण नको, परंतु ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाची आंदोलनं याआधी तीव्र झालेली नाही. परंतु आता आंदोलन तीव्र झालं आहे. टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणाचा विषय तीव्र झालेला आहे. जरांगे पाटील आणि इतर नेते उपोषणास बसले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. अनेकांनी मागणी केली आहे की एक दिवसांचं अधिवेशन घ्यावं पण माझीही मागणी आहे की दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे.  राजस्थानला ६५ टक्के आरक्षण आहे. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत माझ्या खात्याच्या निगडित काही प्रश्न आहेत. मराठा समाजात गरीब मराठ्यांची संख्या आहे. लवकर निर्णय घ्यावा पण थोडा वेळ याला लागू शकतो. जरांगे पाटील यांनी त्यावर विचार करावा. सरकारला वेळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आंदोलन होतायत. कायदा हातात घेऊ नका. केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला सांगितलं म्हणून देणार नाही. त्यांच्या काळात हा मुद्दा होता त्यांना हाताळता आला नाही. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीत कोणाला टाकायचं याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही ते पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण देखील आंदोलन करा. इतर राज्याच्या आरक्षणाचा अभ्यास करून आपल्याकडे काय करता येतंय याचा विचार राज्य सरकारने करावा. जरांगे यांची गरज मराठा समाजाला आहे. त्यांच्या भूमिकेने मराठा समाज खडबडून जागा झाला आहे असंही आठवलेंनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील