शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:09 IST

केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती. सगळ्याच मराठ्यांना आरक्षण नको, परंतु ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाची आंदोलनं याआधी तीव्र झालेली नाही. परंतु आता आंदोलन तीव्र झालं आहे. टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणाचा विषय तीव्र झालेला आहे. जरांगे पाटील आणि इतर नेते उपोषणास बसले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. अनेकांनी मागणी केली आहे की एक दिवसांचं अधिवेशन घ्यावं पण माझीही मागणी आहे की दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे.  राजस्थानला ६५ टक्के आरक्षण आहे. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत माझ्या खात्याच्या निगडित काही प्रश्न आहेत. मराठा समाजात गरीब मराठ्यांची संख्या आहे. लवकर निर्णय घ्यावा पण थोडा वेळ याला लागू शकतो. जरांगे पाटील यांनी त्यावर विचार करावा. सरकारला वेळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आंदोलन होतायत. कायदा हातात घेऊ नका. केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला सांगितलं म्हणून देणार नाही. त्यांच्या काळात हा मुद्दा होता त्यांना हाताळता आला नाही. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीत कोणाला टाकायचं याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही ते पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण देखील आंदोलन करा. इतर राज्याच्या आरक्षणाचा अभ्यास करून आपल्याकडे काय करता येतंय याचा विचार राज्य सरकारने करावा. जरांगे यांची गरज मराठा समाजाला आहे. त्यांच्या भूमिकेने मराठा समाज खडबडून जागा झाला आहे असंही आठवलेंनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील