शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:09 IST

केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती. सगळ्याच मराठ्यांना आरक्षण नको, परंतु ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशांना आरक्षण द्यावे. मराठा समाजाची आंदोलनं याआधी तीव्र झालेली नाही. परंतु आता आंदोलन तीव्र झालं आहे. टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणाचा विषय तीव्र झालेला आहे. जरांगे पाटील आणि इतर नेते उपोषणास बसले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. अनेकांनी मागणी केली आहे की एक दिवसांचं अधिवेशन घ्यावं पण माझीही मागणी आहे की दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे.  राजस्थानला ६५ टक्के आरक्षण आहे. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत माझ्या खात्याच्या निगडित काही प्रश्न आहेत. मराठा समाजात गरीब मराठ्यांची संख्या आहे. लवकर निर्णय घ्यावा पण थोडा वेळ याला लागू शकतो. जरांगे पाटील यांनी त्यावर विचार करावा. सरकारला वेळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आंदोलन होतायत. कायदा हातात घेऊ नका. केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला सांगितलं म्हणून देणार नाही. त्यांच्या काळात हा मुद्दा होता त्यांना हाताळता आला नाही. इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीत कोणाला टाकायचं याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही ते पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण देखील आंदोलन करा. इतर राज्याच्या आरक्षणाचा अभ्यास करून आपल्याकडे काय करता येतंय याचा विचार राज्य सरकारने करावा. जरांगे यांची गरज मराठा समाजाला आहे. त्यांच्या भूमिकेने मराठा समाज खडबडून जागा झाला आहे असंही आठवलेंनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवलेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील