शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

गोविंंदा विल, गेट वेल सून!

By admin | Updated: November 3, 2016 03:06 IST

तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे

शशी करपे,

वसई- दहीहंडीचा सराव करताना जखमी होऊन गेली तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे. पुढील वर्षीच्या गोविंंदापर्यंत हा गोविंंदा स्वत:च्या पायावर उभा राहू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. नालासोपाऱ्यातील कै.रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टने दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवर उपचार करण्याचा उपक्रम यंदापासून हाती घेतला आहे. ही माहिती सोशल मिडीयातून पसरल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील महात्मा फुुले नगरातील झोपडीत अंथरुणाला खिळलेल्या प्रवीण रहाटेची माहिती वैद्य ट्रस्टचे अध्यक्ष अमित यांना मिळाली. त्यांनी प्रवीणवर उपचार सुरु केले. नालासोपाऱ्यातील शिव गणेश दहिहंडी मंडळाचा प्रवीण मजबूत पाया होता. आठ थर लावणारे हे तालुक्यातील पहिले पथक होते. सराव करतांना वरील थर प्रवीणच्या अंगावर कोसळले. त्यात प्रवीणच्या कणा मोडला. २०१३ साली घडलेल्या या अपघाताने शिव गणेश मित्र मंडळ हादरुन गेले. या मंडळाने दहिहंडीच्या कमाईतून जमा केलेला सर्व निधी प्रवीणच्या उपचारावर खर्च केला. लीलावती हॉस्पीटलमध्ये उपचार केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे मंडळाने हार मानली तरी प्रवीणने आपला संघर्ष सुरुच ठेवला. प्रवीण पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहण्याची शक्यता नसतांनाही अंगात जोर आहे तोपर्यंत प्रवीणला काही कमी पडू द्यायचे नाही. या जिद्दीने सुलोचनाबाई अंग मोडेपर्यंत राबताहेत. त्यातच वैद्य ट्रस्टने त्यांना मोठा दिलासा दिला. प्रवीणला पुन्हा उभा करु अशी त्यांनी शाश्वती मावशीला दिली. त्यानंतर वैद्य यांनी प्रवीणवर उपचार केलेल्या लिलावती हॉस्पीटलचे डॉक्टर कोहलींची भेट घेवून पुढील उपचाराबाबात त्यांचे मार्गदर्शन घेतले. सध्या विजय वल्लभ हॉस्पीटल, डॉ.सागर मांगेला यांच्या सहकार्याने प्रवीणवर उपचारही सुरु आहेत.फिजीओथेरेपीस्ट डॉ.श्रद्धा पारेख उपचार करीत आहेत. यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणाही झाली आहे. त्याच्या कमरेला बळ मिळाले असून गुडघ्यांमध्येही ताकद आली आहे. त्याची इच्छाशक्ती जबर असल्यामुळे सुधारणा होऊ लागली आहे. २०१७ च्या दहिहंडी उत्सवापूर्वी प्रवीण स्वत:च्या पायावर उभा राहून उत्सव पहायला नक्की येईल.>‘माय मरो पण मावशी...पावभाजीचा व्यवसाय करणाऱ्या प्रवीणच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला होता. बालपणीच आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या प्रवीणचा त्याची मावशी सुलोचना वाळींजकर यांनी लहानपणापासून सांभाळ केला होता. ‘माय मरो पण मावशी जगो’ या प्रमाणे सुलोचना मावशीने प्रवीणला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तो अंथरुणाला खिळल्यानंतर तर त्यांनी नोकरीही केली. सकाळी प्रवीणची तयारी केल्यानंतर त्याच्यासाठी जेवण तयार करून कामाला जाणे हा त्यांचा परिपाठ होता.