शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

गोविंंदा विल, गेट वेल सून!

By admin | Updated: November 3, 2016 03:06 IST

तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे

शशी करपे,

वसई- दहीहंडीचा सराव करताना जखमी होऊन गेली तीन वर्षे अंथरुणात खितपत पडलेल्या नालासोपाऱ्यातील जखमी गोविंदाच्या प्रकृतीत १० टक्क्याहून अधिक सुधारणा झाली आहे. पुढील वर्षीच्या गोविंंदापर्यंत हा गोविंंदा स्वत:च्या पायावर उभा राहू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. नालासोपाऱ्यातील कै.रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टने दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवर उपचार करण्याचा उपक्रम यंदापासून हाती घेतला आहे. ही माहिती सोशल मिडीयातून पसरल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील महात्मा फुुले नगरातील झोपडीत अंथरुणाला खिळलेल्या प्रवीण रहाटेची माहिती वैद्य ट्रस्टचे अध्यक्ष अमित यांना मिळाली. त्यांनी प्रवीणवर उपचार सुरु केले. नालासोपाऱ्यातील शिव गणेश दहिहंडी मंडळाचा प्रवीण मजबूत पाया होता. आठ थर लावणारे हे तालुक्यातील पहिले पथक होते. सराव करतांना वरील थर प्रवीणच्या अंगावर कोसळले. त्यात प्रवीणच्या कणा मोडला. २०१३ साली घडलेल्या या अपघाताने शिव गणेश मित्र मंडळ हादरुन गेले. या मंडळाने दहिहंडीच्या कमाईतून जमा केलेला सर्व निधी प्रवीणच्या उपचारावर खर्च केला. लीलावती हॉस्पीटलमध्ये उपचार केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे मंडळाने हार मानली तरी प्रवीणने आपला संघर्ष सुरुच ठेवला. प्रवीण पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहण्याची शक्यता नसतांनाही अंगात जोर आहे तोपर्यंत प्रवीणला काही कमी पडू द्यायचे नाही. या जिद्दीने सुलोचनाबाई अंग मोडेपर्यंत राबताहेत. त्यातच वैद्य ट्रस्टने त्यांना मोठा दिलासा दिला. प्रवीणला पुन्हा उभा करु अशी त्यांनी शाश्वती मावशीला दिली. त्यानंतर वैद्य यांनी प्रवीणवर उपचार केलेल्या लिलावती हॉस्पीटलचे डॉक्टर कोहलींची भेट घेवून पुढील उपचाराबाबात त्यांचे मार्गदर्शन घेतले. सध्या विजय वल्लभ हॉस्पीटल, डॉ.सागर मांगेला यांच्या सहकार्याने प्रवीणवर उपचारही सुरु आहेत.फिजीओथेरेपीस्ट डॉ.श्रद्धा पारेख उपचार करीत आहेत. यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणाही झाली आहे. त्याच्या कमरेला बळ मिळाले असून गुडघ्यांमध्येही ताकद आली आहे. त्याची इच्छाशक्ती जबर असल्यामुळे सुधारणा होऊ लागली आहे. २०१७ च्या दहिहंडी उत्सवापूर्वी प्रवीण स्वत:च्या पायावर उभा राहून उत्सव पहायला नक्की येईल.>‘माय मरो पण मावशी...पावभाजीचा व्यवसाय करणाऱ्या प्रवीणच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला होता. बालपणीच आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या प्रवीणचा त्याची मावशी सुलोचना वाळींजकर यांनी लहानपणापासून सांभाळ केला होता. ‘माय मरो पण मावशी जगो’ या प्रमाणे सुलोचना मावशीने प्रवीणला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तो अंथरुणाला खिळल्यानंतर तर त्यांनी नोकरीही केली. सकाळी प्रवीणची तयारी केल्यानंतर त्याच्यासाठी जेवण तयार करून कामाला जाणे हा त्यांचा परिपाठ होता.