शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

गोविंदा आला रे.... राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह

By admin | Published: September 06, 2015 12:34 PM

गोविंदा आला रे असं म्हणत थरारवर थर रचणारी पथकं, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ -  गोविंदा आला रे असं म्हणत थरारवर थर रचणारी पथकं, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे. बहुतांशी ठिकाणी नियम धाब्यावर बसवून दहीहंडी साजरी केली जात असून दहीहंडीनिमित्त राज्यात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

२० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये, दहीहंडीच्या ठिकाणी गाद्या ठेवणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आदी सुरक्षा उपाययोजना करणे, १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास मनाई असे महत्त्वाचे नियम न्यायालयाने दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांना आखून दिले आहेत. रविवारी सकाळपासून मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दिसत असून दुपारनंतर हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दादरमधील आयडियल येथील दहीहंडी जय हनुमान गोविंदा पथकाने फोडली आहे. या ठिकाणी थर कोसळल्याने एक गोविंदा जखमी झाल्याचे समजते. या पथकाने २० फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. 

दरम्यान, ब-याच ठिकाणी न्यायालयाचे धाब्यावर बसवून दहीहंडी साजरी होताना दिसत आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट जाणा-या गोविंदावर कारवाई करु असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. मात्र दादर परिसरात ब-याच ठिकाणी गोविंदांनी हा नियमही धाब्यावर बसवला आहे. मुंबईत यंदा ३,४७० दहीहंडी बांधण्यात आली असून यापैकी ८०० हंड्या या बड्या आयोजकाच्या आहेत.  

आत्तापर्यंत ३२ गोविंदा जखमी

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना आत्तापर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहे. यातील केईएम रुग्णालयात २२ तर शीव रुग्णालयात २ गोविंदावर उपचार करण्यात आले. तर अन्य गोविदांवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.