शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

गोविंदांनी ‘थर’ गाठलाच!

By admin | Updated: September 7, 2015 02:17 IST

‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष करत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी सररास सात, आठ आणि ठाण्यात नऊ थर रचून न्यायालयाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले.

मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष करत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी सररास सात, आठ आणि ठाण्यात नऊ थर रचून न्यायालयाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले. ‘एक्क्या’साठी सररासपणे बालगोविंदांचा सहभाग दिसून आला. आयोजकांनीही न्यायालयाच्या निर्बंधांकडे कानाडोळा करत सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. उत्साहाच्या भरात मात्र मुंबई व उपनगरांमध्ये शंभराहून अधिक गोविंदा जखमी झाले आणि भिवंडी येथे एका गोविंदाचा मृत्यू झाला. दुष्काळी परिस्थिती आणि हायकोर्टाने घातलेल्या निर्बंधांमुळे मुंबई आणि ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित दहीहंड्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे शहर-उपनगरातील नामांकित गोविंदा पथकांनी गल्लीबोळांतील आयोजनांना प्राधान्य दिले. शहर-उपनगरातील काही आयोजनांच्या ठिकाणी न्यायालयाचे नियम सररास धाब्यावर बसवून २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण दिवसभर ट्रकमध्ये खचाखच बसलेले गोविंदा आणि दुचाकी वाहनांचे मोठमोठे थवे शहरात फिरताना दिसून आले.एका गोविंदाचा मृत्यू; १२९ जखमी दहीहंडी बांधताना भिवंडीत अंबाडीजवळील दिघाशी येथे गणेश पाटील या गोविंदाचा मृत्यू झाला. उत्सव साजरा करताना सुरक्षेची काळजी घेऊ, असे आश्वासन मंडळ आणि आयोजकांनी दिले असतानाही दिवसभरात १२९ गोविंदा जखमी झाले; याशिवाय ठाण्यात १०पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाले. दादरच्या आयडियल परिसरातील हंडी ठिकाणी जय हनुमान गोविंदा पथकाने आठ थर रचले तर साई दत्त मित्र मंडळाच्या महिला पथकाने ही हंडी फोडली. आठ थर लावल्याने आयडियलचे आयोजक वादात सापडले आहेत. यासंदर्भात दहीहंडीविरोधात न्यायालयात याचिका करणाऱ्या स्वाती पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. दहीहंडी उत्सवात बोलबाला असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयोजकांनी माघार घेतल्याने शहर-उपनगरांत केवळ सेना भाजपाच्या हंड्यांचा ‘आवाज’ ऐकू आला. मात्र आयोजनांमध्ये न्यायालयाचे निर्बंध सरसकट मोडण्यात आले. त्यामुळे सत्तेत असलेले सेना-भाजपा त्यांच्याशी संबंधित आयोजकांवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.कोर्टाचे निर्बंध आणि मोठ्या आयोजकांच्या माघारीनंतरही गोविंदांचा उत्साह मात्र कमी झालेला नव्हता.