शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राज्यपालांना झाली घाई!

By admin | Updated: September 29, 2014 07:49 IST

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले

मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राज्यपालांना एवढी घाई का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला होता. त्याआधीच राज्यातील निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला जेमतेम १५-२० दिवस उरले असल्याच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू सरकारकडे कारभाराची जबाबदारी सोपविली जाईल, अशी अटकळ राज्यपालांनी चुकीची ठरविली. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय होण्यापूर्वी राज्यपालांनी भाजपा आणि शिवसेनेला पत्र देऊन सरकार स्थापण्याचे आमंत्रण दिले होते. राज्यपालांनी असे पत्र दिल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मान्य केले आहे. या आमंत्रणामागे राजकीय हेतू होता की काय, याचीही चर्चा राजकीय गोटात चवीने सुरू आहे. (विशेष प्रतिनिधी)