शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राज्यपालांनी केले ते योग्यच - मुकुल रोहतगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:49 IST

बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे

पणजी : बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि सुविख्यात वकील मुकुल रोहतगी यांनी नोंदवली आहे. ‘दी वायर’ या वृत्तसंकेतस्थळासाठी करण थापार यांना दिलेल्या मुलाखतीत ते महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर विस्तृतपणे बोलले.अजित पवार यांच्यातर्फे फडणवीस यांच्या समर्थनार्थ राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रावर ५४ आमदारांच्या सह्या असलेल्या आपणही पाहिल्या असल्याचे रोहतगी यांनी या वेळी सांगितले. या सह्यांच्या खरेखोटेपणाची शहानिशा करण्यासाठी राज्यपालांकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते; सह्या दबावाखाली घेतल्या आहेत का, याचीही खातरजमा ते स्वत:हून करू शकत नाहीत, ही बाब राज्यपालांच्या वर्तनावर टीका करणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी, असेही रोहतगी म्हणाले. राज्यपालांना फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्राला समर्थन देणाºया पत्रावर भाजपचे १०५, १९ अपक्ष व अन्य आणि राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्या होत्या, असेही ते म्हणाले.अजित पवार यांच्या बंडानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केले, हे कसे, असे विचारले असता, हातात वेळोवेळी येणाºया कागदपत्रांच्या आधारे निर्णय घ्यायचे असतात, असे रोहतगी यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवट ही लोकशाहीच्या आणि घटनेच्या दृष्टीने अयोग्यच आहे. निवडणुकांनंतर कोणताही राजकीय पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नव्हता. राज्यपालांनी विविध पक्षांना विचारून पाहिले. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागली. मात्र त्यांना जेव्हा पहिली संधी मिळाली, तेव्हा लोकनियुक्त सरकार सत्तेवर आणणे ही आपली जबाबदारी असल्याच्या भावनेने त्यांनी फडणवीसांना निमंत्रण दिले. असे करण्यामागे त्यांचा अन्य काही हेतू होता, असे आपल्याला वाटत नसल्याचे ते म्हणाले. या कृत्यामुळे राज्यपालपदाचे अवमूल्यन झाल्याचे आपल्याला वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांचे समर्थन केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019