शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

राज्यपालांनी केले ते योग्यच - मुकुल रोहतगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 06:49 IST

बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे

पणजी : बहुमताच्या पाठिंब्याविषयी आश्वस्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणे हा राज्यपालांच्या अधिकारांचाच भाग असला, तरी त्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडणे थोडे खटकणारेच आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि सुविख्यात वकील मुकुल रोहतगी यांनी नोंदवली आहे. ‘दी वायर’ या वृत्तसंकेतस्थळासाठी करण थापार यांना दिलेल्या मुलाखतीत ते महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर विस्तृतपणे बोलले.अजित पवार यांच्यातर्फे फडणवीस यांच्या समर्थनार्थ राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रावर ५४ आमदारांच्या सह्या असलेल्या आपणही पाहिल्या असल्याचे रोहतगी यांनी या वेळी सांगितले. या सह्यांच्या खरेखोटेपणाची शहानिशा करण्यासाठी राज्यपालांकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते; सह्या दबावाखाली घेतल्या आहेत का, याचीही खातरजमा ते स्वत:हून करू शकत नाहीत, ही बाब राज्यपालांच्या वर्तनावर टीका करणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी, असेही रोहतगी म्हणाले. राज्यपालांना फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्राला समर्थन देणाºया पत्रावर भाजपचे १०५, १९ अपक्ष व अन्य आणि राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्या होत्या, असेही ते म्हणाले.अजित पवार यांच्या बंडानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केले, हे कसे, असे विचारले असता, हातात वेळोवेळी येणाºया कागदपत्रांच्या आधारे निर्णय घ्यायचे असतात, असे रोहतगी यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवट ही लोकशाहीच्या आणि घटनेच्या दृष्टीने अयोग्यच आहे. निवडणुकांनंतर कोणताही राजकीय पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नव्हता. राज्यपालांनी विविध पक्षांना विचारून पाहिले. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागली. मात्र त्यांना जेव्हा पहिली संधी मिळाली, तेव्हा लोकनियुक्त सरकार सत्तेवर आणणे ही आपली जबाबदारी असल्याच्या भावनेने त्यांनी फडणवीसांना निमंत्रण दिले. असे करण्यामागे त्यांचा अन्य काही हेतू होता, असे आपल्याला वाटत नसल्याचे ते म्हणाले. या कृत्यामुळे राज्यपालपदाचे अवमूल्यन झाल्याचे आपल्याला वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांचे समर्थन केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019