शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना निधी देण्यास सरकारची टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

By संदीप आडनाईक | Updated: July 12, 2025 11:45 IST

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत

संदीप आडनाईककोल्हापूर : बार्टी, सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती पूर्ण दिली, परंतु ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र वनवासच आला आहे. निर्णयानुसार त्यांना केवळ ५ महिने ५ दिवसांचीच अधिछात्रवृत्ती अदा झाली परंतु नोंदणी दिनांकापासून हा निधी देण्यात सरकार गेल्या दोन वर्षांपासून टाळाटाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत आहेत.बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून राज्यातील अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी, भटके विमुक्त या सामाजिक प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षे सातत्याने आंदोलन करावे लागले. त्यानंतर समान धोरण जाहीर केले.२५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के दराने या तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले, पण दिले नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी पूर्ण अधिछात्रवृत्तीसाठी पुन्हा तीव्र आंदोलन केले तेव्हा बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण आणि नोंदणी दिनांकापासून रक्कम दिली. त्यात महाज्योतीच्या १४५३ विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार होता परंतु अधिछात्रवृत्तीसाठी बराच कालावधी लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी झाली नाही, त्यामुळे लाभधारकांची संख्या ९०० विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित झाली.

वित्त विभागाकडून निधी नामंजूरगतवर्षीप्रमाणेच या अधिवेशनातही २०२३ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्यासाठी पाठपुरावा केला पण निधीसाठी केलेली पुरवणी मागणी वित्त विभागाने नाकारली.आंदोलनानंतर आश्वासनमुंबईत ३ जुलैला गिरगाव चौपाटीवर शेकडो विद्यार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. त्याची दखल घेत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले. परंतु निधी नसल्याने मुख्यमंत्र्यांसमवेत आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन दिले परंतु निधी मंजूर केला जात नसल्याने महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण लाभ देण्यात सरकार टाळाटाळ करत आहे.

आमच्यासोबत शिकणाऱ्या बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून छात्रवृत्ती दिली परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना का दिलेली नाही. सरकारन त्यात भेदभाव कशासाठी करत आहे. शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पाळावे, बैठक लावावी. -सद्दाम मुजावर, संशोधक विद्यार्थी, महाज्याेती.