शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना निधी देण्यास सरकारची टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

By संदीप आडनाईक | Updated: July 12, 2025 11:45 IST

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत

संदीप आडनाईककोल्हापूर : बार्टी, सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती पूर्ण दिली, परंतु ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र वनवासच आला आहे. निर्णयानुसार त्यांना केवळ ५ महिने ५ दिवसांचीच अधिछात्रवृत्ती अदा झाली परंतु नोंदणी दिनांकापासून हा निधी देण्यात सरकार गेल्या दोन वर्षांपासून टाळाटाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी ९०० विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत आहेत.बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून राज्यातील अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी, भटके विमुक्त या सामाजिक प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षे सातत्याने आंदोलन करावे लागले. त्यानंतर समान धोरण जाहीर केले.२५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के दराने या तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले, पण दिले नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी पूर्ण अधिछात्रवृत्तीसाठी पुन्हा तीव्र आंदोलन केले तेव्हा बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण आणि नोंदणी दिनांकापासून रक्कम दिली. त्यात महाज्योतीच्या १४५३ विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार होता परंतु अधिछात्रवृत्तीसाठी बराच कालावधी लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी झाली नाही, त्यामुळे लाभधारकांची संख्या ९०० विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित झाली.

वित्त विभागाकडून निधी नामंजूरगतवर्षीप्रमाणेच या अधिवेशनातही २०२३ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्यासाठी पाठपुरावा केला पण निधीसाठी केलेली पुरवणी मागणी वित्त विभागाने नाकारली.आंदोलनानंतर आश्वासनमुंबईत ३ जुलैला गिरगाव चौपाटीवर शेकडो विद्यार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. त्याची दखल घेत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची छात्रवृत्ती देण्याचे जाहीर केले. परंतु निधी नसल्याने मुख्यमंत्र्यांसमवेत आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन दिले परंतु निधी मंजूर केला जात नसल्याने महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण लाभ देण्यात सरकार टाळाटाळ करत आहे.

आमच्यासोबत शिकणाऱ्या बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून छात्रवृत्ती दिली परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना का दिलेली नाही. सरकारन त्यात भेदभाव कशासाठी करत आहे. शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पाळावे, बैठक लावावी. -सद्दाम मुजावर, संशोधक विद्यार्थी, महाज्याेती.