शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-ओबीसी वाद लावण्याचा सरकारचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:49 IST

महायुती सरकारमुळे मोदींना डाग..

फलटण : सगळे मराठे मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी आपण ‘एक घर एक गाडी’ असा नारा दिला आहे. त्यामुळे तमाम मराठा समाजाला आव्हान आहे की, यावेळी कोणीही घरी थांबू नये. ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत समाज हरता कामा नये, मराठ्यांचे हसू होईल, असे एकही मराठ्याने आता वागू नये, राजकारण बाजूला ठेवूऊन मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच, राज्यातील सरकार मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यापासून सावध रहावे, असेही पाटील म्हणाले.पश्चिम महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व समन्वयकांची बैठक फलटण येथील सजाई गार्डन येथे शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाज शांततेत आपली मागणी मांडतो. शांततेत मुंबईला जातो, शांततेत येतो, याचा गैरफायदा सरकार उचलत आहे. यावेळी ताकतीने मुंबईला एकत्र येणे गरजेचे आहे. सरकारला दंगली घडवायच्या आहेत. पण आम्ही मराठी व ओबीसीत वाद होऊ देणार नाही.महायुती सरकारमुळे मोदींना डाग..राज्यातील महायुतीच्या सरकारच्या वागण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देखील अडचणीत येणार आहे. ते ओबीसीची बैठक गोव्यात घेत आहेत, त्यांचा वापर ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात करीत आहेत. मराठ्यांनी आता बेसावध राहू नका. कुठेही दंगल होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. ओबीसींच्या अंगावर जाऊ नका, असे आवाहनही जरांगे यांनी केले.