शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणाच्या कामकाजाला सरकार आव्हान देणार, याचिकेत सुधारणेस हायकोर्टाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:33 IST

दंडाधिकारी अहवालात  आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. सरकारने दंडाधिकाऱ्यांच्या निष्कर्षांना स्थगिती देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूबाबत ठाणे सत्र न्यायालयातील संपूर्ण कामकाजाला आव्हान देण्याची इच्छा राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयापुढे व्यक्त केली. दंडाधिकाऱ्यांच्या निष्कर्षांना स्थगिती देण्याच्या अंतरिम आदेशाला सत्र न्यायालयाने मुदतवाढ दिली नसल्याचेही सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.दंडाधिकारी अहवालात  आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले आहे. सरकारने दंडाधिकाऱ्यांच्या निष्कर्षांना स्थगिती देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी बुधवारच्या सुनावणीत न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाला सांगितले की,  सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या संपूर्ण कामकाजाच्या वैधतेला आव्हान देण्यासाठी सरकार याचिकेत सुधारणा करू इच्छिते. पाच पोलिसांच्या अर्जावर सत्र न्यायालयाने दंडाधिकारी अहवालाला  अंतरिम स्थगिती आदेश दिला होता. “अंतरिम आदेशाला आव्हान देण्यासाठीच सरकारने याचिका दाखल केली होती. आता सत्र न्यायालयाने आपल्या आदेशाला मुदतवाढ दिलेली नसल्याने तांत्रिकदृष्ट्या ती ‘स्थगिती’ ठरत नाही. त्यामुळे सत्र न्यायालयात प्रलंबित संपूर्ण कामकाजालाच आव्हान देण्यासाठी सरकारला याचिकेत सुधारणा करू इच्छिते,” असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

‘सत्र न्यायालयाची            ती कृती अयोग्यच’ दंडाधिकाऱ्यांनी केलेली चौकशी ही एक प्रशासकीय प्रक्रिया होती, न्यायालयीन प्रक्रिया नव्हती. म्हणून ते पाच पोलिस त्याबाबत पुनर्विचार अर्ज दाखल करू शकत  नाहीत, असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी न्यायालयात केला. उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठात या प्रकरणाशी संबंधित खटल्यावर सुनावणी सुरू आहे. असे असतानाही सत्र न्यायालयाने पाच पोलिसांच्या अर्जावर सुनावणी घेणे आणि निर्णय देणे योग्य नव्हते, असा दावाही वेणेगावकर यांनी केला. 

सरकारची विनंती मान्ययाचिकेत सुधारणा करण्याची सरकारची विनंती न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने मान्य करून दंडाधिकाऱ्यांनी ठपका ठेवलेल्या त्या पाच पोलिसांना नोटीस बजावली. या प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी ठेवली. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयState Governmentराज्य सरकार