शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनावर खर्च करावा, खासदार शिंदेचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 19:02 IST

एका आठवड्यात दोन वेळेस दोन विविध ठिकाणी वृक्ष जळाल्याच्या घटना घडल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट भाजपा सरकारलाच टारगेट केले आहे. वृक्ष लागवडीच्या इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनासाठी खर्च करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमी राख फेकलीच नाही - श्रीकांत शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा वृक्ष जाळपोळीचे प्रकरण

ठाणे - सरकारने इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनावर खर्च केला पाहिजे असा आरोप कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. परंतु त्यातील किती वृक्ष जगले हा संशोधनाचा विषय असून या सर्वाचे थर्ड पार्टी आॅडीट झाले पाहिजे, दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि मंगरुळ आणि खुंटवली वृक्ष जाळपोळ प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.                मागील आठवड्यात अंबरनाथ येथील मंगरुळ गावातील वृक्ष जाळपोळ प्रकरण ताजे असतांना शुक्रवारी पुन्हा अंबरनाथ भागातीलच खुंटवली गावातील सुमारे २५ हजार वृक्ष जाळाल्याची घटना घडली आहे. या घटनांमागे भुमाफीया, वीटभट्टी माफीया आणि वन अधिकाऱ्यांची अभद्र युतीमुळेच या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. वनविभागाने वेळीच काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, त्यामुळे जे या प्रकरणात दोषी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.            वणवा लागल्याने किंवा काही समाजकंटाकडून हे कृत्य होत असतांना त्याची साधी चौकशीसुध्दा वनविभागाकडून केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात वर्षभरात १०० हून अधिक अशा घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड केली असली तरी त्यातील १३ लाख वृक्ष तरी जगले आहेत का? याबाबत शंका उपस्थित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच सरकारने वृक्ष लागवडीचे इव्हेंट करण्यापेक्षा वृक्ष संवर्धन खर्च करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील १३ कोटी वृक्षांचे थर्ड पार्टी आॅडीट केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. टप्याटप्याने १३ कोटी वृक्ष नष्ट करण्यासाठी मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय दोषी असलेल्या वनअधिकाºयांवर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर वन विभागाला वृक्षांचे संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी हे खातेच बंद करावे अशी टिकाही त्यांनी केली आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी माझ्या विरोधात निषेध आंदोलन करीत आहेत, त्यामुळे मी जर दोषी असेल तर त्यांनी माझ्यावर खुशाल ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत मी काही त्याला भीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मी राख फेकलीच नाही...ज्या दिवशी वनविभागाच्या अधिकाºयांच्या कार्यालयात आंदोलन झाले. त्यावेळेस मी राख फेकलीच नसल्याचे स्पष्टीकरण आता शिंदे यांनी केले आहे. ज्यावेळेस राख फेकली गेली तेव्ही मी बाहेर होतो. जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा या प्रकरणी मी वनअधिकाºयांची दिलगीरीसुध्दा व्यक्त केली आहे.दोन ठिकाणी ५० हजारांच्या आसपास वृक्षांची जाळपोळमंगरुळ आणि खुंटवली भागात जवळपास ५० हजार वृक्ष जाळण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी दोषी अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून १९ डिसेंबर २०१७ मध्ये आणि १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मागणी केली आहे. परंतु अद्यापही या प्रकरणांमध्ये कोणालाच अटक झालेली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.जीओ टॅगींगचे केवळ कागदी घोडेवृक्ष लागवडीनंतर केवळ जीओ टॅगींग केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात जीओ टॅगींगचे केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी येथील सुरक्षितता वाढविण्याबरोबरच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.योग्य चौकशी न झाल्यास पुन्हा हजोरांच्या संख्येने आंदोलनवांरवार असे प्रकार घडत असतांनासुध्दा या प्रकरणात अद्यापही कोणावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडल्यास किंवा या प्रकरणांची तत्काळ चौकशी करुन कारवाई न केल्यास हजारोंच्या संख्येने पुन्हा जनआंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना