शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

सरकारने इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनावर खर्च करावा, खासदार शिंदेचे भाजपावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 19:02 IST

एका आठवड्यात दोन वेळेस दोन विविध ठिकाणी वृक्ष जळाल्याच्या घटना घडल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट भाजपा सरकारलाच टारगेट केले आहे. वृक्ष लागवडीच्या इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनासाठी खर्च करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमी राख फेकलीच नाही - श्रीकांत शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा वृक्ष जाळपोळीचे प्रकरण

ठाणे - सरकारने इव्हेंटवर खर्च करण्यापेक्षा वृक्ष संवर्धनावर खर्च केला पाहिजे असा आरोप कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. परंतु त्यातील किती वृक्ष जगले हा संशोधनाचा विषय असून या सर्वाचे थर्ड पार्टी आॅडीट झाले पाहिजे, दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि मंगरुळ आणि खुंटवली वृक्ष जाळपोळ प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.                मागील आठवड्यात अंबरनाथ येथील मंगरुळ गावातील वृक्ष जाळपोळ प्रकरण ताजे असतांना शुक्रवारी पुन्हा अंबरनाथ भागातीलच खुंटवली गावातील सुमारे २५ हजार वृक्ष जाळाल्याची घटना घडली आहे. या घटनांमागे भुमाफीया, वीटभट्टी माफीया आणि वन अधिकाऱ्यांची अभद्र युतीमुळेच या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. वनविभागाने वेळीच काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, त्यामुळे जे या प्रकरणात दोषी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.            वणवा लागल्याने किंवा काही समाजकंटाकडून हे कृत्य होत असतांना त्याची साधी चौकशीसुध्दा वनविभागाकडून केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात वर्षभरात १०० हून अधिक अशा घटना घडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड केली असली तरी त्यातील १३ लाख वृक्ष तरी जगले आहेत का? याबाबत शंका उपस्थित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच सरकारने वृक्ष लागवडीचे इव्हेंट करण्यापेक्षा वृक्ष संवर्धन खर्च करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील १३ कोटी वृक्षांचे थर्ड पार्टी आॅडीट केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. टप्याटप्याने १३ कोटी वृक्ष नष्ट करण्यासाठी मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय दोषी असलेल्या वनअधिकाºयांवर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर वन विभागाला वृक्षांचे संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी हे खातेच बंद करावे अशी टिकाही त्यांनी केली आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी माझ्या विरोधात निषेध आंदोलन करीत आहेत, त्यामुळे मी जर दोषी असेल तर त्यांनी माझ्यावर खुशाल ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत मी काही त्याला भीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मी राख फेकलीच नाही...ज्या दिवशी वनविभागाच्या अधिकाºयांच्या कार्यालयात आंदोलन झाले. त्यावेळेस मी राख फेकलीच नसल्याचे स्पष्टीकरण आता शिंदे यांनी केले आहे. ज्यावेळेस राख फेकली गेली तेव्ही मी बाहेर होतो. जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा या प्रकरणी मी वनअधिकाºयांची दिलगीरीसुध्दा व्यक्त केली आहे.दोन ठिकाणी ५० हजारांच्या आसपास वृक्षांची जाळपोळमंगरुळ आणि खुंटवली भागात जवळपास ५० हजार वृक्ष जाळण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी दोषी अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून १९ डिसेंबर २०१७ मध्ये आणि १९ नोव्हेंबर २०१८ रोजी मागणी केली आहे. परंतु अद्यापही या प्रकरणांमध्ये कोणालाच अटक झालेली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.जीओ टॅगींगचे केवळ कागदी घोडेवृक्ष लागवडीनंतर केवळ जीओ टॅगींग केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात जीओ टॅगींगचे केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी येथील सुरक्षितता वाढविण्याबरोबरच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.योग्य चौकशी न झाल्यास पुन्हा हजोरांच्या संख्येने आंदोलनवांरवार असे प्रकार घडत असतांनासुध्दा या प्रकरणात अद्यापही कोणावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडल्यास किंवा या प्रकरणांची तत्काळ चौकशी करुन कारवाई न केल्यास हजारोंच्या संख्येने पुन्हा जनआंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना