शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

एमपीएससी नावालाच, भरती ‘खासगी’तूनच; MPSC मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा?

By दीपक भातुसे | Updated: December 8, 2023 07:58 IST

शासकीय सेवेतील गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतला

नागपूर : शासकीय सेवेतील गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  (एमपीएससी) राबवण्यासाठी सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी निर्णय घेऊनही प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे अद्यापही शासकीय भरतीप्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फतच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शासकीय सेवेतील गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतला. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यातही लिपिक-टंकलेखक ही पदे वगळून उर्वरित पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनिमय, १९६५ च्या नियम ३ मध्ये दुरुस्ती व सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सुरू करावी, असे या निर्णयात नमूद केले आहे. मात्र, त्यासंदर्भात कार्यवाही झाली नसल्याने अजूनही या पदांची भरतीप्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फतच राबविली जात आहे. 

भरतीप्रक्रियेत खासगी कंपनी नकोखासगी कंपन्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी, कॉपीसह विविध गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे भरती परीक्षेची तयारी  करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व भरती परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना शासनाकडे करत आहेत. इतकेच नव्हे तर विधिमंडळ अधिवेशनातही विरोधकांबरोबरच काही सत्ताधारी आमदारांनीही याबाबत सरकारकडे मागणी केली आहे. यानंतर सरकारने तसा निर्णयही केला मात्र, वर्ष उलटूनही अधिकारी या निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांवरही विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शासन निर्णयानुसार सेवा प्रवेश नियमात लवकर सुधारणा करून सर्व भरती परीक्षा एमपीएसीच्या कक्षेत आणाव्यात. - महेश बडे, स्टुडंट्स राइट असोसिएशन

लिपिक टंकलेखक पदांची भरती एमपीएससीमार्फत सुरू केली आहे. उर्वरित पदांच्या सेवा नियमात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पदेही एमपीएससीमार्फत टप्प्याटप्प्याने भरली जातील.- नितीन गद्रे, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग

...तर भरतीप्रक्रियेत येईल पारदर्शकतासेवा प्रवेश नियमात सुधारणा करून सर्व भरतीप्रक्रिया एमपीएमसीच्या कक्षेत आणली तर शासनासह स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय कार्यालये, महामंडळे यातील रिक्त पदे ही एमपीएससीतर्फे भरली जातील आणि त्यात पारदर्शकता येऊ शकेल. मात्र, याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा