शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शासनाच्या सूचना : दोन वर्षे आदर्श गावांना पुरस्कारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 17:38 IST

शासनाच्यावतीने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे

अमरावती : शासनाच्यावतीने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, आदर्श ठरलेल्या गावांकडून जुनीच विकासकामे दाखवून वारंवार पारितोषिक स्वीकारले जात असल्याने शासनाच्यावतीने अशी गावे पुढील दोन वर्षांसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत विचारात न घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हास्तरावर निवड झालेल्या गावांची निवड तालुकास्तरावर करण्यात येत होती तसेच तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम घोषित केलेल्या ग्रामपंचायतीला  त्याच विकासाच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी  नामनिर्देशित करण्यात येत होते. दरम्यान, शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत गावांकडून पुन्हा तीन विकासकामे दाखवून पारितोषिक मिळविले जात होते. त्यामुळे  इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नव्हती.

दरम्यान, जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना संबंधित विकासकामांच्या आधारे वारंवार पारितोषिक न देण्याबाबत शासनाने भूमिका घेतली होती. दरम्यान, शासननिर्णयानुसार स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनांतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावे आणि तालुका आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावांना त्याच विकासकामांच्या आधारे पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत  पुरस्कारासाठी विचारात न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त गावांकडून जुनीच कामे दाखवून वारंवार पारितोषिक मिळविण्याचा प्रकार बंद करण्याच्या निर्णयामुळे  इतर गावांना फायदा  होणार आहे. आदर्श ग्राम योजनेची जुनी कामे दाखविण्याच्या प्रकारामुळे  इतर विकास झालेली गावे दृष्टिआड गेली होती. जुनीच कामे दाखवून पारितोषिक लाटणाºया गावांना शासनानिर्णयामुळे चाप बसणार आहे.