शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

शासनाच्या सूचना : दोन वर्षे आदर्श गावांना पुरस्कारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 17:38 IST

शासनाच्यावतीने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे

अमरावती : शासनाच्यावतीने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, आदर्श ठरलेल्या गावांकडून जुनीच विकासकामे दाखवून वारंवार पारितोषिक स्वीकारले जात असल्याने शासनाच्यावतीने अशी गावे पुढील दोन वर्षांसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत विचारात न घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हास्तरावर निवड झालेल्या गावांची निवड तालुकास्तरावर करण्यात येत होती तसेच तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम घोषित केलेल्या ग्रामपंचायतीला  त्याच विकासाच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी  नामनिर्देशित करण्यात येत होते. दरम्यान, शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत गावांकडून पुन्हा तीन विकासकामे दाखवून पारितोषिक मिळविले जात होते. त्यामुळे  इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नव्हती.

दरम्यान, जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना संबंधित विकासकामांच्या आधारे वारंवार पारितोषिक न देण्याबाबत शासनाने भूमिका घेतली होती. दरम्यान, शासननिर्णयानुसार स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनांतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावे आणि तालुका आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावांना त्याच विकासकामांच्या आधारे पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत  पुरस्कारासाठी विचारात न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त गावांकडून जुनीच कामे दाखवून वारंवार पारितोषिक मिळविण्याचा प्रकार बंद करण्याच्या निर्णयामुळे  इतर गावांना फायदा  होणार आहे. आदर्श ग्राम योजनेची जुनी कामे दाखविण्याच्या प्रकारामुळे  इतर विकास झालेली गावे दृष्टिआड गेली होती. जुनीच कामे दाखवून पारितोषिक लाटणाºया गावांना शासनानिर्णयामुळे चाप बसणार आहे.