शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

कलंकित मंत्र्यांवरून सरकारने पळ काढला

By admin | Updated: July 23, 2016 04:21 IST

विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली.

मुंबई : विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली. शिवाय, कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर देण्याऐवजी सरकारने पळ काढल्याचा आरोप काँगे्रस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. तसेच ‘राईट टू रिप्लाय’ अंतर्गत विरोधकांना बोलू न देता तालिका सभापती योगेश सागर यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याच्या कृत्याचा निषेधही नोंदविला. गुरूवारी झालेल्या चर्चेत २० मंत्र्यावर आम्ही पुराव्यासह आरोप केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय, असे तत्व अंगिकारले आहे. खडसे यांना सत्तेपासून, मत्रिमंडळापासून लांब ठेवण्यात त्यांचा काय हेतू आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. कारण, भोसरी जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. मात्र, दुसरीकडे हेच मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना त्यांच्या विरोधात तपास सुरू असतांना, काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना त्यांचा बचाव करतात. यावरून त्यांची भूमिका संशयास्पद दिसते. मुखयमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाला राईट टू रिप्लाय अंतर्गत बोलण्यास संधी द्यायला हवी होती. मात्र, ती न देता व कार्यक्रम पत्रिकेनुसार विधेयकावर चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी मध्येच मंगलप्रभात यांच्या ठरावावर चर्चेचा आग्रह धरला. त्यांचे हे कृत्यही संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही. तसेच कलंकित मंत्र्यासंदर्भात त्यांनी सभागृहास दिशाभूल करणारी खोटी माहिती दिल्याने आम्ही त्याचा जाब विचारणार होतो. मात्र, त्यांनी तालिका सभापती योगेश सागर यांचा आधार घेऊन त्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब करून पळ काढल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)>तालिका सभापतींच्या भूमिकेवर संशयसरकारच्या या संशयास्पद भूमिकेबाबत विधीमंडळातील पुढील रणनिती ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहातील काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आम्ही सोमवारी बैठक घेणार आहोत. त्यावेळी सर्व प्रमुख नेते आणि आमदारांची मते ऐकून पुढील दिशा ठरविली जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.सभागहातील काही तालिका सभापतींचा कारभार निश्चितच पारदर्शी आहे. मात्र, योगेश सागर यांच्या सारख्या काहींची भूमिका संशयास्पद आहे. ते नेहमी सरकारच्या दबावास बळी पडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही उभयंतानी यावेळी केला.