शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

कलंकित मंत्र्यांवरून सरकारने पळ काढला

By admin | Updated: July 23, 2016 04:21 IST

विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली.

मुंबई : विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली. शिवाय, कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर देण्याऐवजी सरकारने पळ काढल्याचा आरोप काँगे्रस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. तसेच ‘राईट टू रिप्लाय’ अंतर्गत विरोधकांना बोलू न देता तालिका सभापती योगेश सागर यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याच्या कृत्याचा निषेधही नोंदविला. गुरूवारी झालेल्या चर्चेत २० मंत्र्यावर आम्ही पुराव्यासह आरोप केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय, असे तत्व अंगिकारले आहे. खडसे यांना सत्तेपासून, मत्रिमंडळापासून लांब ठेवण्यात त्यांचा काय हेतू आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. कारण, भोसरी जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. मात्र, दुसरीकडे हेच मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना त्यांच्या विरोधात तपास सुरू असतांना, काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना त्यांचा बचाव करतात. यावरून त्यांची भूमिका संशयास्पद दिसते. मुखयमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाला राईट टू रिप्लाय अंतर्गत बोलण्यास संधी द्यायला हवी होती. मात्र, ती न देता व कार्यक्रम पत्रिकेनुसार विधेयकावर चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी मध्येच मंगलप्रभात यांच्या ठरावावर चर्चेचा आग्रह धरला. त्यांचे हे कृत्यही संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही. तसेच कलंकित मंत्र्यासंदर्भात त्यांनी सभागृहास दिशाभूल करणारी खोटी माहिती दिल्याने आम्ही त्याचा जाब विचारणार होतो. मात्र, त्यांनी तालिका सभापती योगेश सागर यांचा आधार घेऊन त्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब करून पळ काढल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)>तालिका सभापतींच्या भूमिकेवर संशयसरकारच्या या संशयास्पद भूमिकेबाबत विधीमंडळातील पुढील रणनिती ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहातील काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आम्ही सोमवारी बैठक घेणार आहोत. त्यावेळी सर्व प्रमुख नेते आणि आमदारांची मते ऐकून पुढील दिशा ठरविली जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.सभागहातील काही तालिका सभापतींचा कारभार निश्चितच पारदर्शी आहे. मात्र, योगेश सागर यांच्या सारख्या काहींची भूमिका संशयास्पद आहे. ते नेहमी सरकारच्या दबावास बळी पडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही उभयंतानी यावेळी केला.