शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

कलंकित मंत्र्यांवरून सरकारने पळ काढला

By admin | Updated: July 23, 2016 04:21 IST

विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली.

मुंबई : विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या २० कलंकित मंत्र्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी आपल्या उत्तरात चुकीची माहिती दिली. शिवाय, कलंकित मंत्र्यांबाबत समाधानकारक उत्तर देण्याऐवजी सरकारने पळ काढल्याचा आरोप काँगे्रस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. तसेच ‘राईट टू रिप्लाय’ अंतर्गत विरोधकांना बोलू न देता तालिका सभापती योगेश सागर यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याच्या कृत्याचा निषेधही नोंदविला. गुरूवारी झालेल्या चर्चेत २० मंत्र्यावर आम्ही पुराव्यासह आरोप केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय, असे तत्व अंगिकारले आहे. खडसे यांना सत्तेपासून, मत्रिमंडळापासून लांब ठेवण्यात त्यांचा काय हेतू आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. कारण, भोसरी जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. मात्र, दुसरीकडे हेच मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना त्यांच्या विरोधात तपास सुरू असतांना, काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना त्यांचा बचाव करतात. यावरून त्यांची भूमिका संशयास्पद दिसते. मुखयमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाला राईट टू रिप्लाय अंतर्गत बोलण्यास संधी द्यायला हवी होती. मात्र, ती न देता व कार्यक्रम पत्रिकेनुसार विधेयकावर चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी मध्येच मंगलप्रभात यांच्या ठरावावर चर्चेचा आग्रह धरला. त्यांचे हे कृत्यही संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही. तसेच कलंकित मंत्र्यासंदर्भात त्यांनी सभागृहास दिशाभूल करणारी खोटी माहिती दिल्याने आम्ही त्याचा जाब विचारणार होतो. मात्र, त्यांनी तालिका सभापती योगेश सागर यांचा आधार घेऊन त्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब करून पळ काढल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)>तालिका सभापतींच्या भूमिकेवर संशयसरकारच्या या संशयास्पद भूमिकेबाबत विधीमंडळातील पुढील रणनिती ठरविण्यासाठी दोन्ही सभागृहातील काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आम्ही सोमवारी बैठक घेणार आहोत. त्यावेळी सर्व प्रमुख नेते आणि आमदारांची मते ऐकून पुढील दिशा ठरविली जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.सभागहातील काही तालिका सभापतींचा कारभार निश्चितच पारदर्शी आहे. मात्र, योगेश सागर यांच्या सारख्या काहींची भूमिका संशयास्पद आहे. ते नेहमी सरकारच्या दबावास बळी पडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही उभयंतानी यावेळी केला.