शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सरकारच्या अधिसूचनेला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं; कायदेतज्ज्ञांना काय वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 20:22 IST

हा आदेश जरी सरकारकडून अंतिम असला तरी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकते असं कायदेतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मुंबई - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली. या अधिसूचनेच्या आधारे १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम झालं असं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही सरकारच्या या अधिसूचनेला कोर्टात आव्हान देता येऊ शकते असं सांगितले आहे. त्यामुळे सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, सरकारने सगेसोयरे याची जी व्याख्या केली आहे त्याला निश्चित कोर्टात आव्हान दिले जाणार. त्यावर कोर्ट निर्णय देईल. परंतु प्राथमिकदृष्ट्या ही व्याख्या बरोबर नाही. एकनाथ शिंदे म्हणाले की, ओबीसीला हात न लावता कायद्यात टिकणारे ५० टक्क्याच्या वरचे आरक्षण देऊ ही जनतेची दिशाभूल करणे आहे. ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. जर मराठा समाज मागास ठरला तर त्यांना ओबीसी प्रवर्गात टाकावे लागेल. ओबीसीतून आरक्षण द्यावे लागेल. जरांगे पाटलांनी हीच मागणी उचलून धरली आहे असं त्यांनी सांगितले. 

तर हा आदेश जरी सरकारकडून अंतिम असला तरी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकते. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण येईल तेव्हा पूर्वी सरकारने घेतलेला निर्णय आणि आता नवीन घेतलेला निर्णय यात जो आरक्षणाला कोटा ठरवून दिलाय त्याला कुठे बाधा पोहचत नाही ना..याची काळजी कोर्ट घेईल. सध्या जी कोंडी होती ती यशस्वी फुटली आहे. आंदोलनकर्त्यांची जी मागणी होती ती तत्वत: सरकारने मान्य केली. सगेसोयरे या शब्दाबाबत जी संग्दिधता होती त्यावरही अध्यादेशात स्पष्टीकरण दिले आहे असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. 

दरम्यान, सरकारच्या अध्यादेशाला कुणीही कोर्टात आव्हान देऊ शकते. यापूर्वीही मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आरक्षण टिकेल की नाही याचे भविष्य आज सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयातील सरकारची भूमिका महत्त्वाची राहील. क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून याआधीच्या त्रुटी सरकारने दूर केल्या तर यापुढचा मार्ग सुकर होऊ शकतो असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे