शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सरकारची जमीन सरकारलाच विकली; नॅशनल हायवेसाठी पुन्हा केले भूसंपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 06:19 IST

शासकीय कामांसाठी सरकारने पूर्वी संपादित केलेली जमीन पुन्हा सरकारलाच विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- विकास राऊत औरंगाबाद : शासकीय कामांसाठी सरकारने पूर्वी संपादित केलेली जमीन पुन्हा सरकारलाच विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. औरंगाबाद शहरानजीक असलेल्या तीसगाव शिवारात हा प्रकार घडला आहे.तीसगाव येथील गट नं. २१६ मधील १३ हेक्टर ५३ आर क्षेत्रातील बहुतांश जमीन सरकारने विविध कामांसाठी संपादित केलेली आहे. मात्र, तीच जमीन पुन्हा नॅशनल हायवे क्र. २११च्या भूसंपादनात सरकारलाच विकण्यात आली आहे.तीसगाव गट नं. २१६ मधील दीड हेक्टर जमिनीचे संपादन २००७ मध्येच झाले. मात्र, २००१ पासून २०१६ पर्यंत मालकीहक्काच्या नोंदींमध्ये फेरफार करून हीच जमीन पुन्हा राष्टÑीय महामार्गसाठी सरकारला विकण्यात आली. या संदर्भात तहसीलदारांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दुहेरी भूसंपादनावर शिक्कामोर्तब झाले. चौकशीची फाइल जिल्हाधिकारी स्तरावर असून, या प्रकरणी संबंधितांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.>भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अफरातफरसमृद्धी महामार्ग आणि राष्टÑीय महामार्ग (एनएच-२११) मधील भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि उपविभागीय अधिकाºयांनी मिळून हा सगळा ‘डबलगेम’ केला असण्याची शक्यता आहे.