शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सरकारने सिंचनाची आकडेवारी दडवली!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:26 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात किती क्षेत्र सिंचनाखाली आले आणि त्यासाठी किती खर्च झाला, याची कोणतीही आकडेवारी २०१७-१८ च्या आर्थिक पहाणी अहवालात देण्यात आलेली नाही.

मुंबई  -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात किती क्षेत्र सिंचनाखाली आले आणि त्यासाठी किती खर्च झाला, याची कोणतीही आकडेवारी २०१७-१८ च्या आर्थिक पहाणी अहवालात देण्यात आलेली नाही.राज्याच्या २०११-१२ या वर्षातील आर्थिक पाहणी अहवालात मागील १० वर्षात राज्यातील सिंचित क्षेत्र फक्त ०.१ टक्क्यांनी वाढल्याचा उल्लेख होता. त्यावरुन विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने काँग्रेस-राष्टÑवादी सरकारला सळो की पळो करून सोडले होते. या टिकेमुळे आघाडी सरकारने जलसंपदा विभागावर श्वेतपत्रिका काढली. १५ वर्षात झालेला खर्च, निर्माण झालेली सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र याची आकडेवारी श्वेतपत्रिकेत देण्यात आली होती. मात्र याच आकडेवारीचा आधार घेत ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला होता. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या पराभवास हा आरोपही कारणीभूत ठरला.भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर जे प्रकल्प ७५ ते ९० टक्के पूर्ण झाले आहेत त्यांना निधी देऊन ते पूर्ण केले जातील, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र गेल्या साडेतीन वर्षात किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले, किती सिंचन क्षमता निर्माण झाली आणि त्यावर किती खर्च झाला, याची आकडेवारीच सरकारने दडवून ठेवली आहे. यावषीच्या आर्थिक पाहणी अहवालातही सिंचनासंदर्भात कोणतीही आकडेवारी ‘उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्यात आले आहे.शिवाय, पहाणी अहवालातील आकडे संक्षिप्त स्वरुपात असल्याने बेरजा जुळतीलच असे नाही, अशी तळटीप देऊन संभाव्य आरोपातून सुटका करून घेतली आहे.

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Maharashtraमहाराष्ट्र