शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Uddhav Thackeray: न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप गंभीर विषय, थातूरमातूर उत्तर नको; उद्धव ठाकरे कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:07 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर-

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर न्यास प्रकरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारकडून हस्तक्षेप केला गेला असं कोर्टाच्या अमायकस क्युरीनंच (न्यायालयाचे मित्र) म्हटलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मंत्र्यानं हस्तक्षेप करणं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणाची फडणवीसांनी ज्या सहजतेनं लिलया कथानक सभागृहात सांगितलं त्यानुसार जर विषय इतका सोपा होता तर तो इतके वर्ष का चालला? अमायकर क्युरी जर म्हणत असेल की सरकारचा हस्तक्षेप झाला होता तर मग याचा अर्थ काय? नुसतं ही एक केस म्हणून याकडे पाहणं चुकीचं आहे. विषय न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारकडून केल्या गेलेल्या हस्तक्षेपाचा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी...नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणासंबंधीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. "मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी घेण्यात आलेला निर्णय नगरविकास खात्याअंतर्गत तत्कालीन मंत्र्यांनी घेतला होता. नगरविकास खात्याच्या अखत्यारित तो निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीचे नगरविकास मंत्री आताही त्याच खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप केलात हा मुद्दा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हा बालिशपणाराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाकडून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला गेला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "ग्रामपंयाचत निवडणुकीत स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात. स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी विविध आघाड्या होत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांचा विजय होत असतो. तिथं पक्षाचा काही थेट संबंध नसतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हे असं करणं म्हणजे बालिशपणा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे