शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Uddhav Thackeray: न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप गंभीर विषय, थातूरमातूर उत्तर नको; उद्धव ठाकरे कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:07 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर-

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर न्यास प्रकरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारकडून हस्तक्षेप केला गेला असं कोर्टाच्या अमायकस क्युरीनंच (न्यायालयाचे मित्र) म्हटलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मंत्र्यानं हस्तक्षेप करणं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणाची फडणवीसांनी ज्या सहजतेनं लिलया कथानक सभागृहात सांगितलं त्यानुसार जर विषय इतका सोपा होता तर तो इतके वर्ष का चालला? अमायकर क्युरी जर म्हणत असेल की सरकारचा हस्तक्षेप झाला होता तर मग याचा अर्थ काय? नुसतं ही एक केस म्हणून याकडे पाहणं चुकीचं आहे. विषय न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारकडून केल्या गेलेल्या हस्तक्षेपाचा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी...नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणासंबंधीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. "मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी घेण्यात आलेला निर्णय नगरविकास खात्याअंतर्गत तत्कालीन मंत्र्यांनी घेतला होता. नगरविकास खात्याच्या अखत्यारित तो निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीचे नगरविकास मंत्री आताही त्याच खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप केलात हा मुद्दा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हा बालिशपणाराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाकडून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला गेला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "ग्रामपंयाचत निवडणुकीत स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात. स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी विविध आघाड्या होत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांचा विजय होत असतो. तिथं पक्षाचा काही थेट संबंध नसतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हे असं करणं म्हणजे बालिशपणा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे