शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

Uddhav Thackeray: न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप गंभीर विषय, थातूरमातूर उत्तर नको; उद्धव ठाकरे कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:07 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर-

राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर न्यास प्रकरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारकडून हस्तक्षेप केला गेला असं कोर्टाच्या अमायकस क्युरीनंच (न्यायालयाचे मित्र) म्हटलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मंत्र्यानं हस्तक्षेप करणं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणाची फडणवीसांनी ज्या सहजतेनं लिलया कथानक सभागृहात सांगितलं त्यानुसार जर विषय इतका सोपा होता तर तो इतके वर्ष का चालला? अमायकर क्युरी जर म्हणत असेल की सरकारचा हस्तक्षेप झाला होता तर मग याचा अर्थ काय? नुसतं ही एक केस म्हणून याकडे पाहणं चुकीचं आहे. विषय न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारकडून केल्या गेलेल्या हस्तक्षेपाचा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी...नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणासंबंधीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. "मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी घेण्यात आलेला निर्णय नगरविकास खात्याअंतर्गत तत्कालीन मंत्र्यांनी घेतला होता. नगरविकास खात्याच्या अखत्यारित तो निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीचे नगरविकास मंत्री आताही त्याच खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप केलात हा मुद्दा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हा बालिशपणाराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाकडून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला गेला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "ग्रामपंयाचत निवडणुकीत स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात. स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी विविध आघाड्या होत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांचा विजय होत असतो. तिथं पक्षाचा काही थेट संबंध नसतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हे असं करणं म्हणजे बालिशपणा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे