शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बारा अधिका-यांकडून सरकारची दिशाभूल, मॅटनेच केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:14 IST

ठाणे, पुणे, मुंबईत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या एफडीएच्या १२ अधिकाºयांनी त्यांच्या बदलीला मॅटमधून स्थगिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच मंत्रालयातील अधिकाºयांशी संगनमत करून मॅटला अपुरी, चुकीची व गूढ स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती देत स्वत:च्या सोयीचे आदेश मिळवून घेतले.

- अतुल कुलकर्णीमुंबई - ठाणे, पुणे, मुंबईत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या एफडीएच्या १२ अधिका-यांनी त्यांच्या बदलीला मॅटमधून स्थगिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच मंत्रालयातील अधिका-यांशी संगनमत करून मॅटला अपुरी, चुकीची व गूढ स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती देत स्वत:च्या सोयीचे आदेश मिळवून घेतले. यामुळे शासनाच्या गतिमान व लोकाभिमुख प्रशासन धोरणाच्या मूळ हेतूलाच सुरुंग लावण्याचे काम या अधिका-यांनी केले आहे, अशा शब्दांत मॅटने मंत्रालयातील अधिका-यांचे वाभाडे काढले आहेत. शिवाय, मॅटच्या आदेशात नमूद केलेल्या सगळ्या मुद्द्यांची मुख्य सचिवांनी संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असेही मॅटचे चेअरमन माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी म्हटले आहे.‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या एफडीएच्या वृत्तमालिकेनंतर झगडे समिती नेमली होती. त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या बदल्या केवळ मीडियाच्या दबावामुळे झालेल्या नाहीत तर झगडे समितीनेसखोल चौकशी करून दिलेल्या निष्कर्षावर आधारित आहेत,असेही मॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे.अन्न व औषधी प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी या सर्व अधिकाºयांच्या बदल्या करताना जी कारणे फाईलमध्ये नमूद केली होती व त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती तीच माहिती मॅटपासून पहिल्या वेळी देण्यात आलेल्या शपथपत्रातून जाणीवपूर्वक दिली गेली नाही. दुसºया वेळी शपथपत्र देताना पहिल्या शपथपत्राला फक्त काही पाने जोडण्यात आली. ते करताना कोणतेही भाष्य करण्याचे टाळले गेले. माध्यमांच्या दबावामुळे आमच्या बदल्या केल्या गेल्या, असे अर्जदारांनी घेतलेले आक्षेप मॅटने पूर्णपणे खोडून काढले. झगडे समितीवर मंत्री बापट यांनी केलेले भाष्यही दडवले गेल्याचे मॅटने आदेशात म्हटले आहे. ज्या अधिकाºयांनी हे सगळे केले त्यांंच्या सकृतदर्शनी हेतू आणि वर्तणुकीवर संशयाचे काळे ढग आहेत. ज्यावर शासनाने अंतिम निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही मॅटने नमूद केले. अन्न व औषधी विभागाच्या सचिवांनी ते स्वत: नागरी सेवा मंडळाचे सदस्य असताना मंत्र्यांच्या आदेशाकडे व शासनाने स्वीकारलेल्या झगडे समितीच्या शिफारशीकडे पूर्णत: जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, मंत्रालयातील उच्च अधिकाºयांनी तसेच नागरी सेवा मंडळाने वैधानिक, नैतिक कर्तव्याचे पालन केलेनाही, असे गंभीर ताशेरे मॅटने ओढले आहेत.आयुक्त-सचिवांवर टीकानागरी सेवा मंडळाचे सदस्य, अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव व प्रधान सचिव या सगळ्यांनी झगडे समितीचा अहवाल व मंत्र्यांच्या आदेशांकडे जाणीवपूर्वक, सहेतूकपणे दुर्लक्ष केले, असा न्यायाधिकारणाचा आक्षेप आहे व त्यांची ही कृती न्यायाधिकरणाच्या तीव्र टीकेस व प्रतिकूल शिफारशीस पात्र आहे, अशा शब्दांत मॅटने सगळ्या अधिकाºयांना फटकारले आहे. संबंधित अधिकारी या कारवाईत पक्षकार नसल्याने यापेक्षा जास्त तीव्रतेने आक्षेप नोंदवण्यात आलेले नाहीत. मात्र या सगळ्या अधिकाºयांच्या गूढ कृतीमागील सत्यशोधनाचा प्रयत्न शासनाने करावा, असेही मॅटच्या चेअरमननी म्हटले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र